शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
5
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
6
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
7
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
8
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
9
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
10
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
11
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
12
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
13
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
14
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
15
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
16
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
17
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
18
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
19
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
20
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना

Arvind Kejriwal in Punjab: मोफत वीजनंतर आता मोफत उपचार...केजरीवालांनी पंजाबसाठी उघडला आश्वासनांचा पेटारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 14:15 IST

Arvind Kejriwal in Punjab: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. केजरीवालांनी पंजाबमधील जनतेला आरोग्य सेवांची हमी दिली आहे.

Arvind Kejriwal in Punjab: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. केजरीवालांनी पंजाबमधील जनतेला आरोग्य सेवांची हमी दिली आहे. यात पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आल्यानंतर जनतेला मोफत उपचार, औषधं आणि चाचण्यांचं आश्वासन देण्यात आलं आहे. यासोबत केजरीवालांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नवज्योत सिंग सिद्धू आम आदमी पक्षात प्रवेश करणार का? याबाबत विचारलं असता त्यांनी हा फक्त एक काल्पनिक प्रश्न असल्याचं केजरीवाल म्हणाले. 

केजरीवालांनी पंजाबमधील जनतेला ६ महत्त्वाची आश्वासनं दिली आहेत. यात आरोग्य क्षेत्राशी संबंधीत मोठ्या घोषणांचा समावेश आहे. केजरीवालांनी केलेल्या घोषणांमुळे आता पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघणार आहे. पंजाब काँग्रेसला तोडीस तोड आव्हान देण्याची तयारी आम आदमी पक्षानं केली आहे. 

केजरीवालींनी दिलेली ६ महत्त्वाची आश्वासनं...- पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीवर मोफत व उत्तम उपचार- संपूर्ण उपचार, चाचण्या, औषधं मोफत देणार. शस्त्रक्रियेचा २० लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार करणार- पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीला हेल्थकार्ड दिलं जाणार. यात एमआरआय, एक्स-रे इत्याही अहवाल सादर केले जातील. - पंजाबमध्ये मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर 'पिंड क्लिनिक' उभारले जाणार. याची एकूण संख्या १६ हजारांच्या आसपास असेल.- पंजाबमधील सर्व शासकीय रुग्णालयांना अत्याधुनिक आणि स्वच्छ करणार. मोठ्या प्रमाणात नवी रुग्णालयं सुरू केली जाणार- पंजाबमध्ये रस्ते अपघातातील अपघातग्रस्तांवर मोफत उपचार केले जाणार

पंजाबमध्ये सरकारचा तमाशा- केजरीवाल"पाच वर्षांपूर्वी जेव्हा पंजाबमधील जनतेनं मोठ्या विश्वासानं काँग्रेसच्या हातात इथली सत्ता दिली होती. पण आज काँग्रेस काहीच काम करताना दिसत नाही. यांनी फक्त तमाशा सुरू केला आहे आणि खुर्चीसाठी घाणरडं राजकारण खेळलं जात आहे. त्यांच्यातील प्रत्येक नेत्याला आज मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यामुळे जनता त्रस्त झालीय", असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपPunjabपंजाब