शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

'दिल्लीत सत्तांतर अटळ; केजरीवालांनी आताच अण्णा हजारेंना शरण जावे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 10:06 IST

दिल्ली सरकारचा केंद्र सरकारसोबत ताळमेळ नसल्यामुळे येथील जनतेचं मोठं नुकसान होत आहे. केंद्र आणि दिल्ली सरकार यांच्याता व्यवस्थीत ताळमेळ असणे आवश्यक आहे. याआधीच आयुष्यमान भारत योजनेवरून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात मतभेद आहेत.

नवी दिल्ली - दिल्लीच्या विकासासाठी विस्तारीत नियोजनाची आवश्यकता आहे. त्यासाठी दिल्लीत असं सरकार हवं आहे, जे केंद्राच्या सोबतीने काम करेल, असं मत दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष विजय गोयल यांनी व्यक्त केले. तसेच पुढील सहा महिन्यात दिल्लीत सत्तांतर निश्चित असून केजरीवाल यांनी दिल्ली सोडून जाण्याची तयारी करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

दिल्लीत वरिष्ठ नागरिकांसाठी आयोजित कार्यक्रमात विजय गोयल बोलत होते. ते म्हणाले, दिल्ली सरकार म्हणतं की, केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेपेक्षा चांगली योजना दिल्लीत सुरू आहे. मात्र त्या योजनेसोबत आयुष्यमान भारत योजना लागू केल्यास दिल्लीतील जनतेला दोन-दोन योजनांचा लाभ घेता येईल. यात दिल्ली सरकारला अडचण असण्याचे कारण काय, असा सवालही गोयल यांनी उपस्थित केला.

दिल्ली सरकारचा केंद्र सरकारसोबत ताळमेळ नसल्यामुळे येथील जनतेचं मोठं नुकसान होत आहे. केंद्र आणि दिल्ली सरकार यांच्याता व्यवस्थीत ताळमेळ असणे आवश्यक आहे. याआधीच आयुष्यमान भारत योजनेवरून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात मतभेद आहेत. दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ३ जून रोजी अरविंद केजरीवाल यांना पत्र पाठवून आयुष्यमान भारत योजना लागू करण्याच्या सूचना केल्या होत्या. प्रत्युत्तर केजरीवाल यांनी दिल्ली सरकारची योजना उत्तम असून आयुष्यमान भारत योजना लागू करण्यास नकार दिला होता.

दरम्यान पुढील सहा महिन्यात दिल्लीत सत्तांतर होणार असून आम आदमी पक्ष पराभूत होणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी आताच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शरण जावे असा टोला विजय गोयल यांनी लागवला.