शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

500 रुपयांत येतात अन्...; केजरीवालांच्या वक्तव्यावरून राजकीय राडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 13:24 IST

केजरीवालांचे काळीज का फाटतय?

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये बाहेरील राज्यातील लोक येऊन पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करून घेण्याचा फायदा घेत आहेत, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. यावरून भाजपा आणि जेडीयूने अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी इतर राज्यातून (खासकरून बिहार) दिल्लीत येणाऱ्या लोकांवर निशाणा साधला. यावरुन विरोध पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दिल्लीतील भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी बिहारहून लोक येत असल्यामुळे अरविंद केजरीवाल यांचे काळीज का फाटत आहे, असा सवाल केला आहे. तर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पार्टी जेडीयूने सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे.

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?अरविंद केजरीवाल यांनी काल एका कार्यक्रमात आरोग्य व्यवस्थेचा उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले," उपचार करण्यासाठी दिल्लीत बाहेरून जास्त लोक येत आहेत. बिहारमधून एक व्यक्ती 500 रुपयांचे तिकीट घेऊन दिल्लीत येतो आणि 5 लाख रुपयांचे ऑपरेशन मोफत करून घेतो."

केजरीवालांचे काळीज का फाटतंय?दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, "पुन्हा एकदा त्यांनी (केजरीवाल) द्वेष दाखविला आहे. जर बिहारचा व्यक्ती दिल्लीत उपचार करतो, तर अरविंद केजरीवाल यांचे काळीज का फाटते? 5 लाखांपर्यंत मोफत उपचार योजना अरविंद केजरीवाल यांनी आणली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही योजना आणली आहे, ज्याला आपण आयुष्मान भारता बोलतो."  

बाळासाहेब ठाकरेंसारखे केजरीवालांनी बोलू नये - जेडीयूजेडीयूचे वरिष्ठ नेता केसी त्यागी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. अरविंद केजरीवाल बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांमुळेच निवडणूक जिंकले होते. ते एख सन्मानीय नेते आहेत. त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे बोलू नये, असे केसी त्यागी यांनी म्हटले आहे. तसेच, ते म्हणाले, "राष्ट्रीय राजधानी फक्त आम आदमी पार्टीची नाही आहे. याठिकाणी देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून लोक उपचारासाठी येतात."  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाBiharबिहार