शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘आप’चा प्रत्येक कार्यकर्ता देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास तयार, अरविंद केजरीवाल यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 06:54 IST

Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पक्षाच्या १२व्या स्थापना दिनानिमित्त देशभरातील कार्यकर्ते, समर्थक आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली  - आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पक्षाच्या १२व्या स्थापना दिनानिमित्त देशभरातील कार्यकर्ते, समर्थक आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना डिजिटल प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. ते म्हणाले की, २०१२ मध्ये संविधान दिनीच आपण सर्वांनी मिळून आम आदमी पक्षाची स्थापना केली होती.

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, या ११ वर्षांत आम्ही अनेक चढउतार पाहिले आणि अनेक अडचणींचा सामना केला. आज आपचा एक-एक कार्यकर्ता देश वाचवण्यासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास तयार आहे. या ११ वर्षांत आपला जितके लक्ष्य करण्यात आले तितके देशाच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला लक्ष्य करण्यात आले नाही. गेल्या ११ वर्षांत त्यांनी आमच्यावर २५०हून अधिक बनावट केसेस दाखल केल्या. ईडी, सीबीआय, आयटी, दिल्ली पोलिसांसह कोणतीही एजन्सी सोडली नाही. तरीही आजपर्यंत त्यांना आमच्याविरुद्ध हेराफेरीचा कोणताही पुरावा सापडलेला नाही आणि एक रुपयाही वसूल झालेला नाही. हे आमच्या प्रामाणिकपणाचे सर्वांत मोठे प्रमाणपत्र आहे.

ते म्हणाले की, आज माझे अंत:करण जड झाले आहे. हा पहिला स्थापना दिवस आहे जेव्हा मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंह आणि विजय नायर आमच्यासोबत नाहीत. त्यांना खोट्या खटल्यात तुरुंगात टाकण्यात आले आहे. आजपर्यंत आमचा एकही आमदार किंवा नेता फुटला नाही. आम्ही भगतसिंग यांचे शिष्य आहोत. सत्याच्या मार्गावर चाललो आहोत. भारताला जगात नंबर एक देश बनवायचे आहे. आम्ही मरू; पण तडजोड करणार नाही. आज भारताचा संविधान दिन आहे. आजच्या दिवशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात बनलेले देशाचे संविधान स्वीकारण्यात आले होते. 

देशाच्या कोनाकोपऱ्यात आम आदमी पार्टीची चर्चा nमुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, आप हा भारताच्या इतिहासातील सर्वांत वेगाने वाढणारा पक्ष ठरला. हे चमत्कारापेक्षा कमी नाही. या ११ वर्षांत जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिले आहे.nजनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीने दोन राज्यात सरकारे तर दोन राज्यात आमदार निवडून आले आहेत. आज देशाच्या कानाकोपऱ्यात आम आदमी पार्टीची चर्चा आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपIndiaभारत