शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘आप’चा प्रत्येक कार्यकर्ता देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास तयार, अरविंद केजरीवाल यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 06:54 IST

Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पक्षाच्या १२व्या स्थापना दिनानिमित्त देशभरातील कार्यकर्ते, समर्थक आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली  - आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पक्षाच्या १२व्या स्थापना दिनानिमित्त देशभरातील कार्यकर्ते, समर्थक आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना डिजिटल प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. ते म्हणाले की, २०१२ मध्ये संविधान दिनीच आपण सर्वांनी मिळून आम आदमी पक्षाची स्थापना केली होती.

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, या ११ वर्षांत आम्ही अनेक चढउतार पाहिले आणि अनेक अडचणींचा सामना केला. आज आपचा एक-एक कार्यकर्ता देश वाचवण्यासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास तयार आहे. या ११ वर्षांत आपला जितके लक्ष्य करण्यात आले तितके देशाच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला लक्ष्य करण्यात आले नाही. गेल्या ११ वर्षांत त्यांनी आमच्यावर २५०हून अधिक बनावट केसेस दाखल केल्या. ईडी, सीबीआय, आयटी, दिल्ली पोलिसांसह कोणतीही एजन्सी सोडली नाही. तरीही आजपर्यंत त्यांना आमच्याविरुद्ध हेराफेरीचा कोणताही पुरावा सापडलेला नाही आणि एक रुपयाही वसूल झालेला नाही. हे आमच्या प्रामाणिकपणाचे सर्वांत मोठे प्रमाणपत्र आहे.

ते म्हणाले की, आज माझे अंत:करण जड झाले आहे. हा पहिला स्थापना दिवस आहे जेव्हा मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंह आणि विजय नायर आमच्यासोबत नाहीत. त्यांना खोट्या खटल्यात तुरुंगात टाकण्यात आले आहे. आजपर्यंत आमचा एकही आमदार किंवा नेता फुटला नाही. आम्ही भगतसिंग यांचे शिष्य आहोत. सत्याच्या मार्गावर चाललो आहोत. भारताला जगात नंबर एक देश बनवायचे आहे. आम्ही मरू; पण तडजोड करणार नाही. आज भारताचा संविधान दिन आहे. आजच्या दिवशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात बनलेले देशाचे संविधान स्वीकारण्यात आले होते. 

देशाच्या कोनाकोपऱ्यात आम आदमी पार्टीची चर्चा nमुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, आप हा भारताच्या इतिहासातील सर्वांत वेगाने वाढणारा पक्ष ठरला. हे चमत्कारापेक्षा कमी नाही. या ११ वर्षांत जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिले आहे.nजनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीने दोन राज्यात सरकारे तर दोन राज्यात आमदार निवडून आले आहेत. आज देशाच्या कानाकोपऱ्यात आम आदमी पार्टीची चर्चा आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपIndiaभारत