शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’चा प्रत्येक कार्यकर्ता देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास तयार, अरविंद केजरीवाल यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 06:54 IST

Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पक्षाच्या १२व्या स्थापना दिनानिमित्त देशभरातील कार्यकर्ते, समर्थक आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली  - आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पक्षाच्या १२व्या स्थापना दिनानिमित्त देशभरातील कार्यकर्ते, समर्थक आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना डिजिटल प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. ते म्हणाले की, २०१२ मध्ये संविधान दिनीच आपण सर्वांनी मिळून आम आदमी पक्षाची स्थापना केली होती.

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, या ११ वर्षांत आम्ही अनेक चढउतार पाहिले आणि अनेक अडचणींचा सामना केला. आज आपचा एक-एक कार्यकर्ता देश वाचवण्यासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास तयार आहे. या ११ वर्षांत आपला जितके लक्ष्य करण्यात आले तितके देशाच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला लक्ष्य करण्यात आले नाही. गेल्या ११ वर्षांत त्यांनी आमच्यावर २५०हून अधिक बनावट केसेस दाखल केल्या. ईडी, सीबीआय, आयटी, दिल्ली पोलिसांसह कोणतीही एजन्सी सोडली नाही. तरीही आजपर्यंत त्यांना आमच्याविरुद्ध हेराफेरीचा कोणताही पुरावा सापडलेला नाही आणि एक रुपयाही वसूल झालेला नाही. हे आमच्या प्रामाणिकपणाचे सर्वांत मोठे प्रमाणपत्र आहे.

ते म्हणाले की, आज माझे अंत:करण जड झाले आहे. हा पहिला स्थापना दिवस आहे जेव्हा मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंह आणि विजय नायर आमच्यासोबत नाहीत. त्यांना खोट्या खटल्यात तुरुंगात टाकण्यात आले आहे. आजपर्यंत आमचा एकही आमदार किंवा नेता फुटला नाही. आम्ही भगतसिंग यांचे शिष्य आहोत. सत्याच्या मार्गावर चाललो आहोत. भारताला जगात नंबर एक देश बनवायचे आहे. आम्ही मरू; पण तडजोड करणार नाही. आज भारताचा संविधान दिन आहे. आजच्या दिवशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात बनलेले देशाचे संविधान स्वीकारण्यात आले होते. 

देशाच्या कोनाकोपऱ्यात आम आदमी पार्टीची चर्चा nमुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, आप हा भारताच्या इतिहासातील सर्वांत वेगाने वाढणारा पक्ष ठरला. हे चमत्कारापेक्षा कमी नाही. या ११ वर्षांत जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिले आहे.nजनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीने दोन राज्यात सरकारे तर दोन राज्यात आमदार निवडून आले आहेत. आज देशाच्या कानाकोपऱ्यात आम आदमी पार्टीची चर्चा आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपIndiaभारत