शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’चा प्रत्येक कार्यकर्ता देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास तयार, अरविंद केजरीवाल यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 06:54 IST

Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पक्षाच्या १२व्या स्थापना दिनानिमित्त देशभरातील कार्यकर्ते, समर्थक आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली  - आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पक्षाच्या १२व्या स्थापना दिनानिमित्त देशभरातील कार्यकर्ते, समर्थक आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना डिजिटल प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. ते म्हणाले की, २०१२ मध्ये संविधान दिनीच आपण सर्वांनी मिळून आम आदमी पक्षाची स्थापना केली होती.

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, या ११ वर्षांत आम्ही अनेक चढउतार पाहिले आणि अनेक अडचणींचा सामना केला. आज आपचा एक-एक कार्यकर्ता देश वाचवण्यासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास तयार आहे. या ११ वर्षांत आपला जितके लक्ष्य करण्यात आले तितके देशाच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला लक्ष्य करण्यात आले नाही. गेल्या ११ वर्षांत त्यांनी आमच्यावर २५०हून अधिक बनावट केसेस दाखल केल्या. ईडी, सीबीआय, आयटी, दिल्ली पोलिसांसह कोणतीही एजन्सी सोडली नाही. तरीही आजपर्यंत त्यांना आमच्याविरुद्ध हेराफेरीचा कोणताही पुरावा सापडलेला नाही आणि एक रुपयाही वसूल झालेला नाही. हे आमच्या प्रामाणिकपणाचे सर्वांत मोठे प्रमाणपत्र आहे.

ते म्हणाले की, आज माझे अंत:करण जड झाले आहे. हा पहिला स्थापना दिवस आहे जेव्हा मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंह आणि विजय नायर आमच्यासोबत नाहीत. त्यांना खोट्या खटल्यात तुरुंगात टाकण्यात आले आहे. आजपर्यंत आमचा एकही आमदार किंवा नेता फुटला नाही. आम्ही भगतसिंग यांचे शिष्य आहोत. सत्याच्या मार्गावर चाललो आहोत. भारताला जगात नंबर एक देश बनवायचे आहे. आम्ही मरू; पण तडजोड करणार नाही. आज भारताचा संविधान दिन आहे. आजच्या दिवशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात बनलेले देशाचे संविधान स्वीकारण्यात आले होते. 

देशाच्या कोनाकोपऱ्यात आम आदमी पार्टीची चर्चा nमुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, आप हा भारताच्या इतिहासातील सर्वांत वेगाने वाढणारा पक्ष ठरला. हे चमत्कारापेक्षा कमी नाही. या ११ वर्षांत जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिले आहे.nजनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीने दोन राज्यात सरकारे तर दोन राज्यात आमदार निवडून आले आहेत. आज देशाच्या कानाकोपऱ्यात आम आदमी पार्टीची चर्चा आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपIndiaभारत