शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

दिल्ली निवडणुकीसाठी गुजरात पोलिसांची पथके तैनात; केजरीवालांच्या आरोपांवर गृहमंत्री म्हणतात,"तुम्हाला आमचचं नाव..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 16:15 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत गुजरात पोलीस तैनात केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

Delhi Assembly Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून आणि प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमधून राज्य राखीव पोलीस दलाच्या आठ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यावरुन आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आक्षेप घेतला आहे. अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाने पंजाब पोलिसांना हटवून त्यांच्या जागी गुजरात पोलिसांचा समावेश केल्याचा आरोप केला आहे. केजरीवाल यांनी आयोगाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केजरीवाल यांच्या या आरोपावर गुजरात सरकारने प्रत्युत्तर दिलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत ही माहिती दिली. "गुजरात पोलिसांचा हा आदेश वाचा. निवडणूक आयोगाने पंजाब पोलिसांना दिल्लीतून हटवले असून गुजरात पोलीस तैनात केले आहेत. हे काय चाललंय?," असं अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पंजाब पोलीस कर्मचाऱ्यांना परत बोलवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी याबाबत भाष्य केलं. हे सर्व राजकारण सुरु असल्याचे केजरीवाल म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांच्या आरोपांनंतर गुजरात सरकारमध्ये गृहमंत्री असलेले हर्ष संघवी यांनी यावर प्रत्युत्तर दिलं आहे. "मला समजले की लोक तुम्हाला फसवे का म्हणतात. केजरीवाल जी, माजी मुख्यमंत्री असूनही तुम्हाला निवडणूक आयोगाची कार्यपद्धती माहीत नाही याचे मला आश्चर्य वाटते. त्यांनी अनेक राज्यांना सक्तीची विनंती केली आहे, फक्त गुजरातच नाही," असं हर्ष संघवी म्हणाले.

"निवडणूक आयोगाने अनेक राज्यांमधून एसआरपी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत, ही एक सामान्य प्रक्रिया आहे. त्यांच्या विनंतीवरून, गुजरातमधील एसआरपीच्या आठ कंपन्या निवडणुकीसाठी ११ जानेवारी रोजी दिल्लीला पाठवण्यात आल्या होत्या. केजरीवाल जी तुम्ही फक्त गुजरातचेच नाव का घेत आहात?," असाही सवाल हर्ष संघवी यांनी केला आहे.

हर्ष संघवी यांनी त्यांच्या पोस्टसोबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एका आदेशाची प्रत देखील  शेअर केली आहे. यामध्ये दिल्ली निवडणुकीत सीआरपीए, बीएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबी व्यतिरिक्त आठ राज्यांचे पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये बिहार, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानच्या पोलिसांचा समावेश आहे.

दरम्यान, दिल्लीतील सर्व ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा