शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

आणखी एका राज्यात INDIA आघाडीला धक्का; केजरीवाल म्हणाले, "स्वबळावर निवडणूक लढवणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 08:13 IST

अरविंद केजरीवाल यांच्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी (28 जानेवारी) मोठी घोषणा केली. हरयाणातील आगामी विधानसभा निवडणुकीत आप एकट्याने लढणार असल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. हरयाणा विधानसभेच्या 90 जागांवर आप स्वबळावर लढणार असला तरी या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्ष इंडिया आघाडीसोबत लढणार आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पंजाबमध्ये आपने लोकसभा निवडणूक एकट्याने लढण्याची घोषणा केली आहे. अशा स्थितीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरयाणात इंडिया आघाडीसोबत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात विरोधकांच्या इंडिया आघाडीला धक्का देत तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार आहेत. बिहारमधील नितीश कुमार यांचा जेडीयू पक्षही इंडिया आघाडीतून बाहेर पडला आहे. मात्र, हरयाणातील लोकसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांनी दरवाजे खुले ठेवले आहेत.

हरयाणातील जींद येथे 'आप'च्या 'बदलाव जनसभे'ला संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, "आज लोकांचा फक्त एकाच पक्षावर विश्वास आहे, तो म्हणजे आम आदमी पक्ष. एका बाजूला त्यांना पंजाब दिसतो तर दुसरीकडे दिल्लीतील आमचे सरकार. आज हरयाणा एका मोठ्या बदलाची वाट पाहत आहे. आधी दिल्ली आणि पंजाबमध्ये लोकांनी हा मोठा बदल केला आणि आता तिथले लोक आनंदी आहेत. आप सर्व 90 जागांवर निवडणूक लढवणार असून हरयाणात आम्ही पुढचे सरकार स्थापन करू. या देशाचे नंबर 1 राज्य बनवले जाईल."

हरयाणा विधानसभा निवडणूक एकट्याने लढवण्याच्या अरविंद केजरीवाल यांच्या घोषणेमुळे इंडिया आघाडीसाठी अडचणीचे ठरले आहे. एकीकडे सर्व राज्यात आघाडी एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे त्यात सामील असलेले पक्ष एका पाठोपाठ बाहेर पडत आहेत. पश्चिम बंगाल हे इंडिया आघाडीमधून बाहेर पडणारे पहिले राज्य आहे, जिथे तृणमूल काँग्रेसने सर्व जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच, तृणमूल काँग्रेसने सांगितले आहे की, इतर राज्यांमध्ये पक्ष इंडिया आघाडीसोबत आहे.

पश्चिम बंगालनंतर पंजाबमध्येही आपने काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे जाहीर केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्व 13 जागांवर आप स्वबळावर लढणार असल्याचे सांगतिले जात आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा असून येथेही इंडिया आघाडीत तेढ निर्माण झाली होती. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू इंडिया आघाडीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे बिहारमधील लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगली कामगिरी करणे कठीण जाणार आहे.

नितीश कुमार यांनी घेतली नवव्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले आहेत. पुन्हा त्यांचे युतीचे साथीदार बदललेले दिसतील, पण मुख्यमंत्री तेच आहेत. नितीश कुमार यांनी रविवारी (28 जानेवारी) सकाळी जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंर नवव्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीAAPआपHaryanaहरयाणाBiharबिहारwest bengalपश्चिम बंगाल