शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 14:52 IST

Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने देशातील जनतेला 10 गॅरंटी दिल्या आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने देशातील जनतेला 10 गॅरंटी दिल्या आहेत. यासोबतच जनतेने आम आदमी पक्षाला केंद्रात निवडून दिल्यास देशाचा विकास 10 वेगवेगळ्या मार्गांनी होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत यासाठी 10 गॅरंटी दिल्या आहेत. काय आहेत ते जाणून घेऊया...

1. 24 तास मोफत वीज

देशात 24 तास वीजपुरवठा होईल. देशाची सर्वाधिक मागणी 2 लाख मेगावॅट आहे. 3 लाख मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची आमची क्षमता आहे, मात्र खराब व्यवस्थापनामुळे वीजपुरवठा खंडित होतो. आपचं सरकार आल्यावर देशातील गरिबांना मोफत वीज दिली जाईल. एका वर्षात सव्वा लाख कोटींचा खर्च येईल जो सरकार देईल. गरिबांना 200 युनिट वीज मोफत दिली जाईल.

2. सर्व मुलांसाठी मोफत शिक्षण

देशभरातील प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिले जाईल. सरकारी शाळांचा स्तर उंचावला जाईल. देशातील सर्व सरकारी शाळा उत्कृष्ट बनवणार. हे काम पूर्ण करण्यासाठी 5 लाख कोटी रुपये लागणार आहेत. यासाठी दरवर्षी 5 लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत. अर्धा खर्च केंद्र आणि अर्धा राज्य सरकार उचलणार आहे.

3. मोफत जागतिक दर्जाचे उपचार

मोहल्ला क्लिनिक देशभरात उघडले जातील. यामध्ये गरीब आणि श्रीमंत दोघांसाठी उपचार मोफत असतील. उपचाराचा दर्जा जागतिक दर्जाचा असेल. जो काही खर्च असेल तो सरकार उचलेल.

4. राष्ट्रीय सुरक्षा

चीनने आपल्या देशाच्या जमिनीवर कब्जा केला आहे पण केंद्र सरकारला हे वास्तव लपवायचे आहे. आपल्या सैन्यात खूप ताकद आहे. चीनच्या ताब्यातील भारतातील सर्व जमीन मोकळी केली जाईल. एकीकडे राजनैतिक पातळीवरही काम केले जाईल आणि लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले जाईल.

5. अग्निवीर योजना बंद करेल

अग्निवीर योजना चार वर्षांनंतर आपल्या तरुणांना काढून टाकते. अशा परिस्थितीत आपण लष्कराला कमकुवत करत आहोत. त्यामुळे ही योजना बंद करण्यात येणार आहे. 

6. शेतकऱ्यांच्या पिकाचा दर निश्चित केला जाईल

जर जनतेने 'आप'ला केंद्रात निवडून आणलं तर आम आदमी पार्टी स्वामिनाथन अहवाल लागू करेल आणि त्यानुसार शेतकऱ्यांना एमएसपी मूल्य दिले जाईल. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

7. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा

केंद्रात सरकार स्थापन झाल्यास दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

8. बेरोजगारी संपेल

वर्षभरात दोन कोटी रोजगार निर्माण होतील. सर्व तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी तयार केले जाईल. रिक्त जागा सोडल्या जातील आणि परीक्षा निष्पक्षपणे घेतल्या जातील.

9. भ्रष्टाचार संपेल

भाजपचे वॉशिंग मशीन चौकाचौकात उभे केले जातील आणि ते तोडले जाईल. प्रामाणिक लोकांना तुरुंगात पाठवण्याची आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्याची सध्याची योजना रद्द केली जाईल. संपूर्ण देश भ्रष्टाचारमुक्त होईल.

10. व्यवसायाचा विस्तार केला जाईल

भारत सरकार देशातील उद्योगपतींना मदत करेल. आपल्या देशातील अनेक मोठे उद्योगपती आपले व्यवसाय बंद करून परदेशात गेले आहेत, यामुळे देशाचे नुकसान होत आहे. देशामध्ये ज्याला व्यवसाय करायचा आहे तो करू शकतो. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४