शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

राज्यांतील सरकारं पाडण्यासाठी मोदी सरकारच्या रथाला तीन घोडे; केजरीवालांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 17:59 IST

"केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार राज्यांतील सरकारे पाडण्यासाठी नवा रथ घेऊन चालली आहे."

केंद्र सरकारने नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार अधिनियमात सुधारणा केल्या आहेत. दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाने (आप) या विधेयकाला रस्त्यापासून संसदेपर्यंत कडाडून विरोध केला. मात्र संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतरही, त्यासंदर्भात गदारोळ सुरूच आहे. आता दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात आप प्रमुख तथा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार राज्यांतील सरकारे पाडण्यासाठी नवा रथ घेऊन चालली आहे. या रथाला ED, CBI आणि कॅश, हे तीन घोडे आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारवर हल्ला चढवताना केजरीवाल म्हणाले, या रथाच्या बळावर भाजपने 9 राज्यांतील सरकारे पाडली आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनाही 25-25 कोटींचे आमिष दाखवण्यात आले. सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाकण्यात आले. हे लोकही भाजपमध्ये दाखल झाले तर त्यांनाही जामीन मिळेल. त्यांनी काहीही केलेले नाही. केजरीवाल पुढे म्हणाले, जेव्हा दिल्लीत भाजपचा रथ येऊन थांबला, तेव्हा हे विधेयक आणले गेले. एवढेच नाही, तर मोदी दिल्लीतील लोकांचा तिरस्कार करतात, असेही केजरीवाल म्हणाले.

'पूर्ण राज्याचा दर्जा' या मुद्द्यावर लढवली जाणार पुढची निवडणूक -अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीची आगामी विधानसभा निवडणूक 'पूर्ण राज्याचा दर्जा' मिळवून देण्याच्या मुद्द्यावर लढली जाईल. केंद्र आणि नायब राज्यपालांवर निशाणा साधताना ते म्हणाले, जर आपल्याला (केंद्राला) वाटत असेल की, आपण नायब राज्यपालांच्या माध्यमाने देश चालवू, तर देशातील 140 कोटी जनता हे मॉडेल चालू देणार नाही. याचवेळी, आगामी लोकसभा निवडणूकही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावर लढवली जाईल. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वच्या सर्व सातही जागांवर पराभूत होईल, असा दावाही केजरीवाल यांनी केला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाdelhiदिल्लीlok sabhaलोकसभा