शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

राज्यांतील सरकारं पाडण्यासाठी मोदी सरकारच्या रथाला तीन घोडे; केजरीवालांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 17:59 IST

"केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार राज्यांतील सरकारे पाडण्यासाठी नवा रथ घेऊन चालली आहे."

केंद्र सरकारने नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार अधिनियमात सुधारणा केल्या आहेत. दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाने (आप) या विधेयकाला रस्त्यापासून संसदेपर्यंत कडाडून विरोध केला. मात्र संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतरही, त्यासंदर्भात गदारोळ सुरूच आहे. आता दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात आप प्रमुख तथा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार राज्यांतील सरकारे पाडण्यासाठी नवा रथ घेऊन चालली आहे. या रथाला ED, CBI आणि कॅश, हे तीन घोडे आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारवर हल्ला चढवताना केजरीवाल म्हणाले, या रथाच्या बळावर भाजपने 9 राज्यांतील सरकारे पाडली आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनाही 25-25 कोटींचे आमिष दाखवण्यात आले. सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाकण्यात आले. हे लोकही भाजपमध्ये दाखल झाले तर त्यांनाही जामीन मिळेल. त्यांनी काहीही केलेले नाही. केजरीवाल पुढे म्हणाले, जेव्हा दिल्लीत भाजपचा रथ येऊन थांबला, तेव्हा हे विधेयक आणले गेले. एवढेच नाही, तर मोदी दिल्लीतील लोकांचा तिरस्कार करतात, असेही केजरीवाल म्हणाले.

'पूर्ण राज्याचा दर्जा' या मुद्द्यावर लढवली जाणार पुढची निवडणूक -अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीची आगामी विधानसभा निवडणूक 'पूर्ण राज्याचा दर्जा' मिळवून देण्याच्या मुद्द्यावर लढली जाईल. केंद्र आणि नायब राज्यपालांवर निशाणा साधताना ते म्हणाले, जर आपल्याला (केंद्राला) वाटत असेल की, आपण नायब राज्यपालांच्या माध्यमाने देश चालवू, तर देशातील 140 कोटी जनता हे मॉडेल चालू देणार नाही. याचवेळी, आगामी लोकसभा निवडणूकही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावर लढवली जाईल. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वच्या सर्व सातही जागांवर पराभूत होईल, असा दावाही केजरीवाल यांनी केला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाdelhiदिल्लीlok sabhaलोकसभा