शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवार मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 10:57 IST

Arunachal Pradesh Assembly Election 2024: अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक वर्षे सत्ता असणाऱ्या काँग्रेसची यावेळी बिकट अवस्था झाली असून, पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.  एवढंच नाही तर काँग्रेसला (Congress) ४१ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच मिळाले नाहीत, अशी माहिती आता समोर आली आहे. 

देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल मात्र रविवारीच जाहीर झाला असून, त्यापैकी अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाने ६० पैकी ४६ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. मागच्या वेळपेक्षा भाजपाला काही जागा अधिक मिळाल्या आहेत. मात्र दुसरीकडे अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक वर्षे सत्ता असणाऱ्या काँग्रेसची यावेळी बिकट अवस्था झाली असून, पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.  एवढंच नाही तर काँग्रेसला ४१ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच मिळाले नाहीत, अशी माहिती आता समोर आली आहे. 

२०१९ मध्ये काँग्रेसने अरुणाचल प्रदेशमध्ये ४ जागांवर विजय मिळवला होता. मात्र यावेळी काँग्रेसला राज्यातील ६० पैकी केवळ १९ जागांवरच निवडणूक लढवता आली. याबाबत समोर येत असलेल्या कारणांनुसार पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांना नॉमिनेट करण्याच्या पक्षाच्या निर्णयाचं उल्लंघन केलं. तर अनेक काँग्रेस नेत्यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या आखाड्यातून पळ काढला. अनेकजण भाजपामध्ये गेले. मात्र काँग्रेसने पूर्व कामेंग जिल्ह्यातील बामेंग विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले  कुमार वाय हे विजय मिळवण्यात यशस्वी ठरले. या निवडणुकीत काँग्रेसचे विजयी झालेले ते एकमेव उमेदवार ठरले. 

दरम्यान, काँग्रेसने अरुणाचल प्रदेशमधील निवडणुकीसाठी ३५ उमेदवारांची यादी तयार केली होती. मात्र यामधील १० जणांनी उमेदवारी अर्च भरला नाही. उर्वरित उमेदवारांपैकी ५ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली. कानुबारी लोकसभा मतदारसंघातील सोम्फा वांगसा यांनी उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर उमेदावारी मागे घेत भाजपामध्ये प्रवेश केला. दरम्यान, भाजपासोबत कथितपणे हातमिळवणी केल्याच्या आरोपामुळे काँग्रेसने अनेक नेत्यांना पक्षातून बाहेरची वाट दाखवली. यामधील ९ जणांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही. 

दरम्यान, काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, आपण निवडणूक लढवत नसल्याचे या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवत नसल्याची कल्पना पक्षाला दिली नाही. अखेरपर्यंत ते उमेदवारीसाठी झगडत होते. मात्र नंतर त्या्ंनी माघार घेतली. दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नाबाम तुकी यांनी उमेदवारांच्या माघारीसाठी धनशक्ती कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. आम्ही नक्कीच निराश झालोय. मात्र हताश झालेलो नाहीत. आम्ही पराभवाच्या कारणांचं आत्मपरीक्षण करू. तसेच पुन्हा एकदा पक्ष संघटनेवर काम करू, असे ते म्हणाले. 

टॅग्स :arunachal pradesh lok sabha election 2024अरुणाचल लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024