शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

अरुणाचलमध्ये मोबाइलवर येते चीनचे नेटवर्क, भारतीय पायाभूत सोयी कमी असल्याचा उठविला गैरफायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 02:07 IST

सीमेवरील सैन्याला व जनतेला पायाभूत सुविधा देण्यात भारताला पूर्ण यश आले नसल्याचा फायदा घेत, ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशात चीन भारताच्या दूरसंचार यंत्रणेला आव्हान दिले आहे.

किबिथू/काहो (अरुणाचल प्रदेश) - सीमेवरील सैन्याला व जनतेला पायाभूत सुविधा देण्यात भारताला पूर्ण यश आले नसल्याचा फायदा घेत, ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशात चीन भारताच्या दूरसंचार यंत्रणेला आव्हान दिले आहे.राज्याच्या सीमेवरील भागात भारतीयांच्या मोबाइलवर वेलकम टू चायना (चीनमध्ये तुमचे स्वागत आहे) असे संदेश येऊ लागले आहेत. भारतीय सीमेवर लष्कर वाढवल्यामुळे मात्र चीनने संबंध बिघडतील, असा इशारा भारताला दिला आहे.डोकलाम प्रश्नावरून भारत-चीनमधील वाद संपला असे वाटत असले तरी चीनच्या कागाळ्या सुरूच आहेत. भारतीयांच्या मोबाइलवर स्थानिक नव्हे, तर चिनी कंपन्यांचे नेटवर्क दिसत आहे. तसेच घड्याळातील वेळही अडीच तास पुढील म्हणजे चिनी टाइम झोनप्रमाणे दिसत असून, काही संदेश चीनमधील मँडरिनमध्ये भाषेतील आहेत. किबीथू व काहो हा अरुणाचल प्रदेशातील सीमेवरील भाग असून, त्या पलिकडे तिबेटचा भाग सुरू होतो. तिबेटप्रमाणेच अरुणाचल प्रदेश हाही आमचा भाग आहे, असा चीनचा दावा आहे. हा सर्व भाग भारताचा असला तरी तिथे कसल्याही पायाभूत सोयी नाहीत. त्याचाच गैरफायदा चीन घेत आहे. किबीथूपर्यंत पोहोचण्यासाठी एकच रस्ता असून, तिथे सतत भूस्खलन होत असल्याने जवानांना तिथे पोहोचण्यात वा साधनसामग्री पोहोचवण्यात असंख्य अडचणी येतात. सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी जवानांना ७0 किलोमीटर पायपीट करावी लागते. याउलट चीनने सीमेपलीकडे स्वत:च्या हद्दीतरस्ते व पूल बांधले आहेत. तसेच जवानांसाठी तीन मजली इमारतही बांधली आहेत.दूरसंचार यंत्रणा भक्कम असावी, यासाठी २00३ साली तिथे आॅप्टिकल फायबरची केबल टाकण्यात आली होती. पण तिची सतत दुरुस्ती करावी लागते. परिणामी मोबाइल व टेलिफोन अनेकदा बंद असतात. तसेच मोबाइल सुरू होतात, तेव्हा बऱ्याचदा चीनचेच नेटवर्क दिसते.चीनचा इशाराबीजिंग : भारताने अरुणाचल प्रदेशच्या किबीथू भागातील सीमेवर आपली लष्करी कुमक वाढविल्यामुळे चीन संतापला आहे. भारताने अशा कागाळ्या करून, दोन देशांतील संबंध बिघडण्यास कारण बनू नये, असा अनाहूत सल्ला भारताला दिला आहे.भारत आपल्या भागातच सैन्य वाढवत असला, तरी त्यामुळे परस्पर विश्वासाला तडा जाईल, तसेच आर्थिक, राजनैतिक व सांस्कृतिक देवाण-घेवाणीवरही विपरित परिणाम होईल, असा इशारा चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ वृत्तपत्रातून देण्यात आला आहे.

टॅग्स :MobileमोबाइलArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशIndiaभारतchinaचीन