शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचलमध्ये मोबाइलवर येते चीनचे नेटवर्क, भारतीय पायाभूत सोयी कमी असल्याचा उठविला गैरफायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 02:07 IST

सीमेवरील सैन्याला व जनतेला पायाभूत सुविधा देण्यात भारताला पूर्ण यश आले नसल्याचा फायदा घेत, ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशात चीन भारताच्या दूरसंचार यंत्रणेला आव्हान दिले आहे.

किबिथू/काहो (अरुणाचल प्रदेश) - सीमेवरील सैन्याला व जनतेला पायाभूत सुविधा देण्यात भारताला पूर्ण यश आले नसल्याचा फायदा घेत, ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशात चीन भारताच्या दूरसंचार यंत्रणेला आव्हान दिले आहे.राज्याच्या सीमेवरील भागात भारतीयांच्या मोबाइलवर वेलकम टू चायना (चीनमध्ये तुमचे स्वागत आहे) असे संदेश येऊ लागले आहेत. भारतीय सीमेवर लष्कर वाढवल्यामुळे मात्र चीनने संबंध बिघडतील, असा इशारा भारताला दिला आहे.डोकलाम प्रश्नावरून भारत-चीनमधील वाद संपला असे वाटत असले तरी चीनच्या कागाळ्या सुरूच आहेत. भारतीयांच्या मोबाइलवर स्थानिक नव्हे, तर चिनी कंपन्यांचे नेटवर्क दिसत आहे. तसेच घड्याळातील वेळही अडीच तास पुढील म्हणजे चिनी टाइम झोनप्रमाणे दिसत असून, काही संदेश चीनमधील मँडरिनमध्ये भाषेतील आहेत. किबीथू व काहो हा अरुणाचल प्रदेशातील सीमेवरील भाग असून, त्या पलिकडे तिबेटचा भाग सुरू होतो. तिबेटप्रमाणेच अरुणाचल प्रदेश हाही आमचा भाग आहे, असा चीनचा दावा आहे. हा सर्व भाग भारताचा असला तरी तिथे कसल्याही पायाभूत सोयी नाहीत. त्याचाच गैरफायदा चीन घेत आहे. किबीथूपर्यंत पोहोचण्यासाठी एकच रस्ता असून, तिथे सतत भूस्खलन होत असल्याने जवानांना तिथे पोहोचण्यात वा साधनसामग्री पोहोचवण्यात असंख्य अडचणी येतात. सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी जवानांना ७0 किलोमीटर पायपीट करावी लागते. याउलट चीनने सीमेपलीकडे स्वत:च्या हद्दीतरस्ते व पूल बांधले आहेत. तसेच जवानांसाठी तीन मजली इमारतही बांधली आहेत.दूरसंचार यंत्रणा भक्कम असावी, यासाठी २00३ साली तिथे आॅप्टिकल फायबरची केबल टाकण्यात आली होती. पण तिची सतत दुरुस्ती करावी लागते. परिणामी मोबाइल व टेलिफोन अनेकदा बंद असतात. तसेच मोबाइल सुरू होतात, तेव्हा बऱ्याचदा चीनचेच नेटवर्क दिसते.चीनचा इशाराबीजिंग : भारताने अरुणाचल प्रदेशच्या किबीथू भागातील सीमेवर आपली लष्करी कुमक वाढविल्यामुळे चीन संतापला आहे. भारताने अशा कागाळ्या करून, दोन देशांतील संबंध बिघडण्यास कारण बनू नये, असा अनाहूत सल्ला भारताला दिला आहे.भारत आपल्या भागातच सैन्य वाढवत असला, तरी त्यामुळे परस्पर विश्वासाला तडा जाईल, तसेच आर्थिक, राजनैतिक व सांस्कृतिक देवाण-घेवाणीवरही विपरित परिणाम होईल, असा इशारा चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ वृत्तपत्रातून देण्यात आला आहे.

टॅग्स :MobileमोबाइलArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशIndiaभारतchinaचीन