शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचलमध्ये मोबाइलवर येते चीनचे नेटवर्क, भारतीय पायाभूत सोयी कमी असल्याचा उठविला गैरफायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 02:07 IST

सीमेवरील सैन्याला व जनतेला पायाभूत सुविधा देण्यात भारताला पूर्ण यश आले नसल्याचा फायदा घेत, ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशात चीन भारताच्या दूरसंचार यंत्रणेला आव्हान दिले आहे.

किबिथू/काहो (अरुणाचल प्रदेश) - सीमेवरील सैन्याला व जनतेला पायाभूत सुविधा देण्यात भारताला पूर्ण यश आले नसल्याचा फायदा घेत, ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशात चीन भारताच्या दूरसंचार यंत्रणेला आव्हान दिले आहे.राज्याच्या सीमेवरील भागात भारतीयांच्या मोबाइलवर वेलकम टू चायना (चीनमध्ये तुमचे स्वागत आहे) असे संदेश येऊ लागले आहेत. भारतीय सीमेवर लष्कर वाढवल्यामुळे मात्र चीनने संबंध बिघडतील, असा इशारा भारताला दिला आहे.डोकलाम प्रश्नावरून भारत-चीनमधील वाद संपला असे वाटत असले तरी चीनच्या कागाळ्या सुरूच आहेत. भारतीयांच्या मोबाइलवर स्थानिक नव्हे, तर चिनी कंपन्यांचे नेटवर्क दिसत आहे. तसेच घड्याळातील वेळही अडीच तास पुढील म्हणजे चिनी टाइम झोनप्रमाणे दिसत असून, काही संदेश चीनमधील मँडरिनमध्ये भाषेतील आहेत. किबीथू व काहो हा अरुणाचल प्रदेशातील सीमेवरील भाग असून, त्या पलिकडे तिबेटचा भाग सुरू होतो. तिबेटप्रमाणेच अरुणाचल प्रदेश हाही आमचा भाग आहे, असा चीनचा दावा आहे. हा सर्व भाग भारताचा असला तरी तिथे कसल्याही पायाभूत सोयी नाहीत. त्याचाच गैरफायदा चीन घेत आहे. किबीथूपर्यंत पोहोचण्यासाठी एकच रस्ता असून, तिथे सतत भूस्खलन होत असल्याने जवानांना तिथे पोहोचण्यात वा साधनसामग्री पोहोचवण्यात असंख्य अडचणी येतात. सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी जवानांना ७0 किलोमीटर पायपीट करावी लागते. याउलट चीनने सीमेपलीकडे स्वत:च्या हद्दीतरस्ते व पूल बांधले आहेत. तसेच जवानांसाठी तीन मजली इमारतही बांधली आहेत.दूरसंचार यंत्रणा भक्कम असावी, यासाठी २00३ साली तिथे आॅप्टिकल फायबरची केबल टाकण्यात आली होती. पण तिची सतत दुरुस्ती करावी लागते. परिणामी मोबाइल व टेलिफोन अनेकदा बंद असतात. तसेच मोबाइल सुरू होतात, तेव्हा बऱ्याचदा चीनचेच नेटवर्क दिसते.चीनचा इशाराबीजिंग : भारताने अरुणाचल प्रदेशच्या किबीथू भागातील सीमेवर आपली लष्करी कुमक वाढविल्यामुळे चीन संतापला आहे. भारताने अशा कागाळ्या करून, दोन देशांतील संबंध बिघडण्यास कारण बनू नये, असा अनाहूत सल्ला भारताला दिला आहे.भारत आपल्या भागातच सैन्य वाढवत असला, तरी त्यामुळे परस्पर विश्वासाला तडा जाईल, तसेच आर्थिक, राजनैतिक व सांस्कृतिक देवाण-घेवाणीवरही विपरित परिणाम होईल, असा इशारा चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ वृत्तपत्रातून देण्यात आला आहे.

टॅग्स :MobileमोबाइलArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशIndiaभारतchinaचीन