शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

अरुण जेटली यांना अर्थशास्त्रच कळत नाही; सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा अहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 05:40 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्रातील अजिबात काहीच कळत नाही. राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानी असताना, ते मात्र आपण पाचव्या स्थानी असल्याचे सांगत फिरत आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्रातील अजिबात काहीच कळत नाही. राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानी असताना, ते मात्र आपण पाचव्या स्थानी असल्याचे सांगत फिरत आहेत. त्यांच्याच सांगण्यावरून पंतप्रधान मोदीही तसे बोलत आहेत, अशी टीका भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपाला घरचा अहेरच दिला. जेटली यांची अक्कलच त्यांनी काढली. तुम्ही अर्थमंत्री झालात तर काय कराल, या प्रश्नावर सुब्रमण्यम स्वामी उत्तरले की, प्राप्तिकर नावाचा प्रकारच मी बंद करेन. भ्रष्टाचाराचे कारण प्राप्तिकरच आहे. तोच संपवून टाकायला हवा. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास त्यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही असाल का, या प्रश्नावर ते म्हणाले की, तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, पण मी मंत्री झालो तर माझ्या खात्यात मी कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही.मी चंद्रशेखर व नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मंत्री होतो. त्यामुळे मंत्रिपद मला काही नवीन नाहीे. भारतीय मुस्लीम यांना मी काही समस्या मानत नाही. केरळ, तामिळनाडूमधील मुस्लीम समाज शिकलेला आहे. त्यामुळे तिथे ते आपल्या कुटुंबाचे नियोजन करतात, मुले किती असावीत, हे ठरवतात.चौकीदार नाही; मी ब्राह्मण आहेस्वामी यांनी भाजपाच्या अन्य नेत्यांप्रमाणे स्वत:च्या नावापुढे चौकीदार असे लावण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की, मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण कधीच चौकीदार असू शकत नाही. मी चौकीदाराला अमूक एक काम करायला सांगतो. त्याच्याकडून मी कामे करवून घेतो. त्यामुळे स्वत:ला कधीही चौकीदार म्हणवून घेणार नाही. स्वामी यांनी त्या सर्वांना एका प्रकारे टोलाच लगावला आहे.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीArun Jaitleyअरूण जेटली