शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अरुण जेटली यांना अर्थशास्त्रच कळत नाही; सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा अहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 05:40 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्रातील अजिबात काहीच कळत नाही. राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानी असताना, ते मात्र आपण पाचव्या स्थानी असल्याचे सांगत फिरत आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्रातील अजिबात काहीच कळत नाही. राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानी असताना, ते मात्र आपण पाचव्या स्थानी असल्याचे सांगत फिरत आहेत. त्यांच्याच सांगण्यावरून पंतप्रधान मोदीही तसे बोलत आहेत, अशी टीका भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपाला घरचा अहेरच दिला. जेटली यांची अक्कलच त्यांनी काढली. तुम्ही अर्थमंत्री झालात तर काय कराल, या प्रश्नावर सुब्रमण्यम स्वामी उत्तरले की, प्राप्तिकर नावाचा प्रकारच मी बंद करेन. भ्रष्टाचाराचे कारण प्राप्तिकरच आहे. तोच संपवून टाकायला हवा. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास त्यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही असाल का, या प्रश्नावर ते म्हणाले की, तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, पण मी मंत्री झालो तर माझ्या खात्यात मी कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही.मी चंद्रशेखर व नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मंत्री होतो. त्यामुळे मंत्रिपद मला काही नवीन नाहीे. भारतीय मुस्लीम यांना मी काही समस्या मानत नाही. केरळ, तामिळनाडूमधील मुस्लीम समाज शिकलेला आहे. त्यामुळे तिथे ते आपल्या कुटुंबाचे नियोजन करतात, मुले किती असावीत, हे ठरवतात.चौकीदार नाही; मी ब्राह्मण आहेस्वामी यांनी भाजपाच्या अन्य नेत्यांप्रमाणे स्वत:च्या नावापुढे चौकीदार असे लावण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की, मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण कधीच चौकीदार असू शकत नाही. मी चौकीदाराला अमूक एक काम करायला सांगतो. त्याच्याकडून मी कामे करवून घेतो. त्यामुळे स्वत:ला कधीही चौकीदार म्हणवून घेणार नाही. स्वामी यांनी त्या सर्वांना एका प्रकारे टोलाच लगावला आहे.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीArun Jaitleyअरूण जेटली