शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Arun Jaitley Death: एक 'वेगळीच' सर्जरी... ज्यामुळे चर्चेत आले होते अरुण जेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 14:11 IST

सॉफ्ट टिश्यू सरकोमा नावाच्या कॅन्सरमुळे दगावलेेले अरूण जेटली काही वर्षांपूर्वी एका वेगळ्याच सर्जरीमुळे फार चर्चेत आले होते.

(Image Credit : Rajya Sabha TV)

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २४ ऑगस्टला दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते नवी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांची स्थिती इतकी बिघडली होती की, त्यांनी यावेळी आरोग्याच्या कारणामुळे नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. 

(Image Credit : www.newsstate.com)

६७ वर्षीय अरूण जेटली यांना सॉफ्ट टिश्यू सरकोमा नावाच्या कॅन्सरने ग्रासले होते. असेही सांगितले जाते की, यामुळेच त्यांना श्वास घेण्यासही अडचण येत होती. काही वर्षांपूर्वी ते एका वेगळ्याच सर्जरीमुळे फार चर्चेत आले होते. डायबिटीसने पीडित जेटली यांनी हार्ट सर्जरी आणि लठ्ठपणापासून सुटका मिळवण्यासाठी बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी केली होती. आणि त्यावेळी लठ्ठपणा दूर करणाऱ्या या सर्जरीमुळे फारच चर्चेत आले होते. मात्र, ही बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी काय असते हे कदाचित फार लोकांना माहीत नाही. चला तर जाणून घेऊ काय आहे ही सर्जरी.

काय आहे बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी?

(Image Credit : www.livemint.com)

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण त्यातील सर्वात सोपी पद्धत मानली जाते बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी. माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी त्यांचं वजन कमी करण्यासाठी या सर्जरीचा आधार घेतला होता. ही सर्जरी तीन प्रकारची असते. लॅप बॅंड, स्लीव गॅस्ट्रिक्टोमी आणि गॅस्ट्रिक बायपास सर्जरी. ही सर्जरी लेप्रोस्कोपिक पद्धतीने केली जाते. लॅप बॅंड सर्जरीनंतर व्यक्तीची खाण्याची क्षमता फार कमी होते.

(Image Credit : khaleejtimes.com)

स्लीव गॅस्ट्रिक्टोमीनंतर व्यक्तीचं दर आठवड्याला दीड ते दोन किलो वजन कमी होऊ लागतं. १२ ते १३ महिन्यात ८० ते ८५ टक्के वजन याने कमी होतं. नंतर गॅस्ट्रिक बायपास करून जठर विभागून बॉलच्या आकाराचं करून सोडून दिलं जातं. या सर्जरीमुळे अन्न उशीरा पचन होतं. भूक वाढवणारा 'ग्रेहलीन' हार्मोनही तयार होणं बंद होतं. अशात शरीरातील जमा चरबी ऊर्जेच्या रूपात खर्च होऊ लागते आणि वजन वेगाने कमी होऊ लागतं.

ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात वजन वाढवणारे हार्मोन्स हटवले जातात. जेणेकरून व्यक्तीचं वजन सामान्य गतीने कमी व्हावं. बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीनंतर व्यक्तीला भूक कमी लागते. ज्यामुळे एका वर्षाच्या आतच व्यक्तीचं ५० ते ६० किलो वजन कमी होऊ शकतं.

(Image Credit : businesstoday.in)

दरम्यान, वजन कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या इतर सर्जरी फार घातक असतात. तर वजन कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्जरींपेक्षा बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीचे धोके कमी असल्याचे मानले जाते. ही सर्जरी लेप्रोस्कोपिक पद्धतीने केली जाते, ज्यात व्यक्तीला वेदना कमी होतात. तरी सुद्धा वर्षभर रूग्णाची विशेष काळजी घ्यावी लागते. 

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीBJPभाजपाNew Delhiनवी दिल्ली