शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

Arun Jaitley Death: एक 'वेगळीच' सर्जरी... ज्यामुळे चर्चेत आले होते अरुण जेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 14:11 IST

सॉफ्ट टिश्यू सरकोमा नावाच्या कॅन्सरमुळे दगावलेेले अरूण जेटली काही वर्षांपूर्वी एका वेगळ्याच सर्जरीमुळे फार चर्चेत आले होते.

(Image Credit : Rajya Sabha TV)

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २४ ऑगस्टला दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते नवी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांची स्थिती इतकी बिघडली होती की, त्यांनी यावेळी आरोग्याच्या कारणामुळे नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. 

(Image Credit : www.newsstate.com)

६७ वर्षीय अरूण जेटली यांना सॉफ्ट टिश्यू सरकोमा नावाच्या कॅन्सरने ग्रासले होते. असेही सांगितले जाते की, यामुळेच त्यांना श्वास घेण्यासही अडचण येत होती. काही वर्षांपूर्वी ते एका वेगळ्याच सर्जरीमुळे फार चर्चेत आले होते. डायबिटीसने पीडित जेटली यांनी हार्ट सर्जरी आणि लठ्ठपणापासून सुटका मिळवण्यासाठी बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी केली होती. आणि त्यावेळी लठ्ठपणा दूर करणाऱ्या या सर्जरीमुळे फारच चर्चेत आले होते. मात्र, ही बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी काय असते हे कदाचित फार लोकांना माहीत नाही. चला तर जाणून घेऊ काय आहे ही सर्जरी.

काय आहे बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी?

(Image Credit : www.livemint.com)

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण त्यातील सर्वात सोपी पद्धत मानली जाते बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी. माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी त्यांचं वजन कमी करण्यासाठी या सर्जरीचा आधार घेतला होता. ही सर्जरी तीन प्रकारची असते. लॅप बॅंड, स्लीव गॅस्ट्रिक्टोमी आणि गॅस्ट्रिक बायपास सर्जरी. ही सर्जरी लेप्रोस्कोपिक पद्धतीने केली जाते. लॅप बॅंड सर्जरीनंतर व्यक्तीची खाण्याची क्षमता फार कमी होते.

(Image Credit : khaleejtimes.com)

स्लीव गॅस्ट्रिक्टोमीनंतर व्यक्तीचं दर आठवड्याला दीड ते दोन किलो वजन कमी होऊ लागतं. १२ ते १३ महिन्यात ८० ते ८५ टक्के वजन याने कमी होतं. नंतर गॅस्ट्रिक बायपास करून जठर विभागून बॉलच्या आकाराचं करून सोडून दिलं जातं. या सर्जरीमुळे अन्न उशीरा पचन होतं. भूक वाढवणारा 'ग्रेहलीन' हार्मोनही तयार होणं बंद होतं. अशात शरीरातील जमा चरबी ऊर्जेच्या रूपात खर्च होऊ लागते आणि वजन वेगाने कमी होऊ लागतं.

ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात वजन वाढवणारे हार्मोन्स हटवले जातात. जेणेकरून व्यक्तीचं वजन सामान्य गतीने कमी व्हावं. बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीनंतर व्यक्तीला भूक कमी लागते. ज्यामुळे एका वर्षाच्या आतच व्यक्तीचं ५० ते ६० किलो वजन कमी होऊ शकतं.

(Image Credit : businesstoday.in)

दरम्यान, वजन कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या इतर सर्जरी फार घातक असतात. तर वजन कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्जरींपेक्षा बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीचे धोके कमी असल्याचे मानले जाते. ही सर्जरी लेप्रोस्कोपिक पद्धतीने केली जाते, ज्यात व्यक्तीला वेदना कमी होतात. तरी सुद्धा वर्षभर रूग्णाची विशेष काळजी घ्यावी लागते. 

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीBJPभाजपाNew Delhiनवी दिल्ली