शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

३७० रद्द करण्याचा निर्णय मागे घेणार नाही, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 04:27 IST

३७० कलम रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरचा प्रदेश भारतीय संघराज्याशी योग्य पद्धतीने जोडला गेला आहे. ३७० कलमाबाबतचा निर्णय मागे घेणार नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला गुरुवारी सांगितले.

नवी दिल्ली : ३७० कलम रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरचा प्रदेश भारतीय संघराज्याशी योग्य पद्धतीने जोडला गेला आहे. ३७० कलमाबाबतचा निर्णय मागे घेणार नाही, असे केंद्र सरकारनेसर्वोच्च न्यायालयाला गुरुवारी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एन. व्ही. रामन, न्या. एस. के. कौल, न्या. भूषण गवई, न्या. आर. सुभाष रेड्डी, न्या. सूर्यकांत यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर यासंदर्भातील याचिकांची सुनावणी सुरू आहे. ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केल्या आहेत.जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम संसदेने ५ आॅगस्ट रोजी रद्दबातल केले. यासंदर्भात अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, या कलमामुळे जम्मू-काश्मीरला मिळालेले सार्वभौमत्व हे तात्पुरते होते. ते कलमच रद्दबातल झाल्यामुळे जम्मू-काश्मीर खऱ्या अर्थाने व पूर्णपणे भारतीय संघराज्यात समाविष्ट झाले आहे.असे अन्य राज्यांबाबतही करतीलएका याचिकादारातर्फे ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी न्यायालयाला सांगितले की, जम्मू-काश्मीरला राज्याचा असलेला दर्जा काढून तो केंद्रशासित प्रदेश करण्यात आला. काश्मीरबाबत घेतला तसा निर्णय केंद्र सरकार अन्य कोणत्याही राज्यासंदर्भात घेऊ शकते हा त्यातील एक धोका आहे. सरकारने काश्मीरमध्ये जाणूनबुजून राष्ट्रपती राजवट लादली.आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी धवन यांनी जम्मू-काश्मीरच्या नकाशाकडे न्यायाधीशांचे लक्ष वेधले. त्यांच्या या कृतीला जम्मू-काश्मीरच्या वतीने बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी विरोध केला. तेव्हा राजीव धवन म्हणाले की, जर अटर्नी जनरल आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी जवाहरलाल नेहरूंची उदाहरणे देऊ शकतात, तर मी जम्मू-काश्मीरचा नकाशा न्यायमूर्तींना दाखविल्यास त्यात काहीही वावगे नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार