शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कलम ३७० तात्पुरतेच होते; रद्दच्या निर्णयावर सुप्रीम मोहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 05:08 IST

जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० मधील तरतुदी रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एकमताने कायम ठेवला.

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० मधील तरतुदी रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एकमताने कायम ठेवला. लवकरात लवकर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करून पुढीलवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत विधानसभा निवडणुका घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

कित्येक दशकांपासून चाललेल्या चर्चेचा शेवट करताना, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने १९४७ मध्ये जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या घटनात्मक तरतुदी रद्द करण्याचे समर्थन करणारे तीन समान निवाडे दिले. स्वतःसाठी, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासाठी निकाल लिहिताना, चंद्रचूड म्हणाले की, कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती आणि राष्ट्रपतींना पूर्वीच्या राज्याच्या संविधान सभेच्या अनुपस्थितीत ते रद्द करण्याचा अधिकार दिला होता.

न्या. संजय किशन कौल आणि न्या. संजीव खन्ना यांनी या मुद्द्यावर स्वतंत्र व एकसमान निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरमधून लडाखचा केंद्रशासित प्रदेश वेगळा काढण्याच्या निर्णयाची वैधता कायम ठेवली.  कलम ३७० रद्द करताना राज्याचे जम्मू-काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले.

राज्यात सार्वभौमत्व राहिलेले नाही

पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीर राज्याने २५ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधानाचा स्वीकार केल्याची घोषणा जारी केल्यानंतर आणि भारताने राज्याचे अधिग्रहण केल्यानंतर राज्यात कोणतेही सार्वभौमत्व राहिलेले नाही. कलम ३७० हे असममित संघराज्यवादाचे वैशिष्ट्य आहे आणि सार्वभौमत्वाचे नाही, असे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड म्हणाले.

निवडणूक आयोगाने पावले उचलावीत

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या विधानाचा संदर्भ देत न्या. चंद्रचूड म्हणाले, लडाखचा केंद्रशासित प्रदेश वगळता जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल केला जाईल.

भारतीय राज्यघटना ही घटनात्मक शासनाची संपूर्ण संहिता आहे. जम्मू-काश्मीर 

विधानसभेच्या ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत घेण्यासाठी  निवडणूक आयोगाने पावले उचलावीत. 

मानवाधिकार उल्लंघन चौकशीसाठी आयोग 

nन्यायमूर्ती कौल म्हणाले की, कलम ३७० चा उद्देश जम्मू आणि काश्मीरला हळूहळू इतर भारतीय राज्यांच्या बरोबरीने आणणे आहे. न्या. खन्ना यांनीही चंद्रचूड व कौल यांच्याशी सहमती दर्शवली.

n१९८० पासून झालेल्या येथे मानवी हक्क उल्लंघनाच्या अनेक घटना घडल्या. त्याची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन आयोग स्थापन करण्याचे निर्देशही न्या. कौल यांनी दिले.

हा निकाल आशेचा किरण

सर्वोच्च न्यायालयाचा कलम ३७० संदर्भातील निकाल हा केवळ न्यायालयीन निकाल नाही, तर आशेचा किरण आहे. तो मजबूत आणि अखंड भारत निर्माण करण्याच्या सामूहिक संकल्पाचे दर्शन घडवतो. 

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

दूरदृष्टीने घेतलेला निर्णय 

कलम ३७० रद्द करण्याचा तसेच जम्मू-काश्मीर व लडाख हे केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचा निर्णय दूरदृष्टीने घेतला होता. त्यामुळे काश्मीरचे देशाशी एकात्मतेचे बंध आणखी दृढ झाले आहेत. 

- अमित शाह, गृहमंत्री

सरन्यायाधीश म्हणाले...

राष्ट्रपतींनी केलेली घोषणा वैध होती की नाही, याचा विचार आम्ही करत नाही. शिवाय त्याला कोणी आव्हानही दिले नाही.

राष्ट्रपती राजवटीत केंद्राने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला आव्हान देता येत नाही. त्याबाबत आम्ही निर्णय देऊ शकत नाही.

जम्मू-काश्मीरची संविधान सभा संपुष्टात आली, तेव्हा कलम ३७० लागू करण्याची विशेष अटही संपुष्टात आली.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर