शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

काश्मीरमधील इंटरनेट सेवा ठप्पच; अनेक तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 09:17 IST

दोन महिन्यांपासून काश्मीरमधील इंटरनेट सेवा ठप्प

श्रीनगर: काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारनं राज्यातील इंटरनेट सेवा बंद केली. याचा परिणाम राज्यातील संपर्क व्यवस्थेवर झाला आहे. काश्मीरमध्ये कित्येक वर्षांनी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम काश्मीर खोऱ्यातील अर्थव्यवस्थेवर झालेला पाहायला मिळत आहे. काश्मीरमधील आयटी कंपन्या धोक्यात आल्या आहेत. त्यातील अनेक कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. 'इंडिया टुडे'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. रंगरेट भागात काश्मीरमधलं सर्वात मोठं सॉफ्टवेअर पार्क आहे. यातील अनेक आयटी कंपन्या सध्या धोक्यात आहेत. इमूकीत सिस्टम्स सोल्युशन कंपनीत भागीदार असलेल्या शौकत अहमद यांनी त्यांची व्यथा मांडली. सहा वर्षांपूर्वी अहमद यांनी सुरू केलेल्या कंपनीत सध्या ३० पेक्षा अधिक तरुण काम करतात. त्यांच्या कंपनीकडे देश, परदेशातील अनेक प्रकल्प आहेत. मात्र गेले दोन महिने इंटरनेट सेवा ठप्प झाल्यानं इमूकीत सिस्टम्स सोल्युशन कंपनीला प्रचंड नुकसान सोसावं लागलं आहे. आमचं संपूर्ण काम इंटरनेट चालतं. मात्र इंटरनेट सुविधाच नसल्यानं आमच्या ग्राहकांशी संपर्क साधताना अतिशय अडचणी येत असल्याचं शौकत यांनी सांगितलं. इंटरनेटच नसल्यानं आम्ही काम थांबवलं आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आम्हाला कंपनी बंद करावी लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. शाहिद नासीर नावाच्या उद्योजकानंदेखील कंपनी संकटात सापडल्याचं सांगितलं. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय भविष्यासाठी चांगला असल्याचं सरकार सांगतं. मात्र आमच्या वर्तमानाचं काय, असा सवाल नासीर यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370