शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

काश्मीरमधील इंटरनेट सेवा ठप्पच; अनेक तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 09:17 IST

दोन महिन्यांपासून काश्मीरमधील इंटरनेट सेवा ठप्प

श्रीनगर: काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारनं राज्यातील इंटरनेट सेवा बंद केली. याचा परिणाम राज्यातील संपर्क व्यवस्थेवर झाला आहे. काश्मीरमध्ये कित्येक वर्षांनी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम काश्मीर खोऱ्यातील अर्थव्यवस्थेवर झालेला पाहायला मिळत आहे. काश्मीरमधील आयटी कंपन्या धोक्यात आल्या आहेत. त्यातील अनेक कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. 'इंडिया टुडे'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. रंगरेट भागात काश्मीरमधलं सर्वात मोठं सॉफ्टवेअर पार्क आहे. यातील अनेक आयटी कंपन्या सध्या धोक्यात आहेत. इमूकीत सिस्टम्स सोल्युशन कंपनीत भागीदार असलेल्या शौकत अहमद यांनी त्यांची व्यथा मांडली. सहा वर्षांपूर्वी अहमद यांनी सुरू केलेल्या कंपनीत सध्या ३० पेक्षा अधिक तरुण काम करतात. त्यांच्या कंपनीकडे देश, परदेशातील अनेक प्रकल्प आहेत. मात्र गेले दोन महिने इंटरनेट सेवा ठप्प झाल्यानं इमूकीत सिस्टम्स सोल्युशन कंपनीला प्रचंड नुकसान सोसावं लागलं आहे. आमचं संपूर्ण काम इंटरनेट चालतं. मात्र इंटरनेट सुविधाच नसल्यानं आमच्या ग्राहकांशी संपर्क साधताना अतिशय अडचणी येत असल्याचं शौकत यांनी सांगितलं. इंटरनेटच नसल्यानं आम्ही काम थांबवलं आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आम्हाला कंपनी बंद करावी लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. शाहिद नासीर नावाच्या उद्योजकानंदेखील कंपनी संकटात सापडल्याचं सांगितलं. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय भविष्यासाठी चांगला असल्याचं सरकार सांगतं. मात्र आमच्या वर्तमानाचं काय, असा सवाल नासीर यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370