शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

३७० कलम : वर्ष उलटले तरी विकासाची प्रतीक्षा कायमच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 02:00 IST

आजही अनेक निर्बंध; भविष्यात बदल होण्याची तरुणांना अपेक्षा

निनाद देशमुखपुणे : दहशतवाद, सातत्याने लादला जाणारा कर्फ्यू यामुळे काश्मिरी नागरिक आधीच त्रस्त होता. त्यात ३७० कलम रद्द करीत काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आला. या निर्णयाने वेगाने विकास होईल, अशी आश्वासने देण्यात आली. मात्र, वर्षाच्या सुरुवातीला कर्फ्यू आणि त्यानंतर कोरोना लॉकडाऊन यामुळे काहीही होऊ शकलेले नाही. उलट अनेक समस्यांमध्ये भर पडत गेल्याने येथील तरुणांमध्ये नाराजी आहे.

५ आॅगस्ट २०१९ ला केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू-काश्मीरचे विभाजन करीत दोन नव्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. हा निर्णय घेताना येथे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, उद्योगधंदे येतील, दहशतवाद संपेल, फुटीरतावादी वृत्तींना आळा बसेल, असे सांगण्यात आले होते. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षात ना रोजगार आले ना प्रगतीची अन्य चिन्हे दिसून आली. कुपवाडा जिल्ह्यातील बी.कॉम.पर्यंत शिकलेला जहीद अजीज शेख सध्या कंत्राटदार आहे. मात्र, गेल्या वर्षभरात नव्या निर्बंधांमुळे त्याला कुठलेही नवे कंत्राट मिळालेले नाही. शिवाय अनेक शासकीय कंत्राटांची आधीची बिलेही थकली आहेत. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. बेरोजगार तरुण दहशतवाद्यांकडे तरुण आकर्षित होत आहेत. राज्य दर्जा असतानाही या समस्या अशाच होत्या. पूर्वी लोक त्यांच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे मांडू शकत; परंतु आज तो अधिकारही त्यांच्याकडे राहिलेला नाही.नाशिक येथे होमिओपॅथीचे शिक्षण घेत असलेली आणि मूळची अनंतनाग जिल्ह्यातील असलेली नादिया शेख म्हणाली, केंद्रशासित प्रदेश बनल्याने विकास होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, सुरुवातीला असलेल्या बंदमुळे आणि कोरोना लॉकडाऊनमुळे प्रशासनाला अनेक मर्यादा आल्या असतील. येत्या काळात नक्कीच यात बदल होईल. बी.एस्सी. आणि सिव्हिल इंजिनिअर असलेला कुपवाडा येथील शौकत अहमद मीर म्हणाला की, नागरिकांना रोजगार असेल, तर त्यांना अन्य गोष्टींचा विचार करायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे प्राधान्याने रोजगारनिर्मिती करायला हवी. सध्या कोरोनामुळे सर्व बंद आहे. कामे नसल्याने विरोधाचा सूर वाढतो आहे.दहशतवाद्यांच्या घटनेत वाढवर्षभरात अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. लष्कर आणि पोलिसांतर्फे या कारवाया करण्यात आल्या. सुरक्षारक्षकांना यात यश आले असले तरी दहशतवाद हा दिवसेंदिवस वाढतच आहे.पर्यटनही बंददेशाचे नंदनवन असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र, कर्फ्यू आणि लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय गेल्या वर्षभरापासून बंद आहे. यामुळे याठिकाणी बेरोजगारी वाढली आहे.वाट पाहावी लागेलपाकिस्तानला थेट युद्धात भारताला हरवणे कठीण असल्याने त्यांनी दहशवादाचा स्वीकार केला. येथील तरुणांना दहशतवादी प्रवृत्तींपासून परावृत्त करणे गरजेचे आहे. केंद्रशासित प्रदेशामुळे विकासाला वाव आहे. एका वर्षात याचे परिणाम दिसतील, असे म्हणणे योग्य होणार नाही. विकासासाठी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.-अता हसनेन,निवृत्त लेफ्टनंट जनरल

टॅग्स :Article 370कलम 370corona virusकोरोना वायरस बातम्याRam Mandirराम मंदिर