शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
3
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
4
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
5
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
6
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
7
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
8
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
9
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
10
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
11
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
12
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
13
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
14
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
15
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
16
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
17
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
18
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
19
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
20
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली

३७० कलम : वर्ष उलटले तरी विकासाची प्रतीक्षा कायमच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 02:00 IST

आजही अनेक निर्बंध; भविष्यात बदल होण्याची तरुणांना अपेक्षा

निनाद देशमुखपुणे : दहशतवाद, सातत्याने लादला जाणारा कर्फ्यू यामुळे काश्मिरी नागरिक आधीच त्रस्त होता. त्यात ३७० कलम रद्द करीत काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आला. या निर्णयाने वेगाने विकास होईल, अशी आश्वासने देण्यात आली. मात्र, वर्षाच्या सुरुवातीला कर्फ्यू आणि त्यानंतर कोरोना लॉकडाऊन यामुळे काहीही होऊ शकलेले नाही. उलट अनेक समस्यांमध्ये भर पडत गेल्याने येथील तरुणांमध्ये नाराजी आहे.

५ आॅगस्ट २०१९ ला केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू-काश्मीरचे विभाजन करीत दोन नव्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. हा निर्णय घेताना येथे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, उद्योगधंदे येतील, दहशतवाद संपेल, फुटीरतावादी वृत्तींना आळा बसेल, असे सांगण्यात आले होते. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षात ना रोजगार आले ना प्रगतीची अन्य चिन्हे दिसून आली. कुपवाडा जिल्ह्यातील बी.कॉम.पर्यंत शिकलेला जहीद अजीज शेख सध्या कंत्राटदार आहे. मात्र, गेल्या वर्षभरात नव्या निर्बंधांमुळे त्याला कुठलेही नवे कंत्राट मिळालेले नाही. शिवाय अनेक शासकीय कंत्राटांची आधीची बिलेही थकली आहेत. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. बेरोजगार तरुण दहशतवाद्यांकडे तरुण आकर्षित होत आहेत. राज्य दर्जा असतानाही या समस्या अशाच होत्या. पूर्वी लोक त्यांच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे मांडू शकत; परंतु आज तो अधिकारही त्यांच्याकडे राहिलेला नाही.नाशिक येथे होमिओपॅथीचे शिक्षण घेत असलेली आणि मूळची अनंतनाग जिल्ह्यातील असलेली नादिया शेख म्हणाली, केंद्रशासित प्रदेश बनल्याने विकास होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, सुरुवातीला असलेल्या बंदमुळे आणि कोरोना लॉकडाऊनमुळे प्रशासनाला अनेक मर्यादा आल्या असतील. येत्या काळात नक्कीच यात बदल होईल. बी.एस्सी. आणि सिव्हिल इंजिनिअर असलेला कुपवाडा येथील शौकत अहमद मीर म्हणाला की, नागरिकांना रोजगार असेल, तर त्यांना अन्य गोष्टींचा विचार करायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे प्राधान्याने रोजगारनिर्मिती करायला हवी. सध्या कोरोनामुळे सर्व बंद आहे. कामे नसल्याने विरोधाचा सूर वाढतो आहे.दहशतवाद्यांच्या घटनेत वाढवर्षभरात अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. लष्कर आणि पोलिसांतर्फे या कारवाया करण्यात आल्या. सुरक्षारक्षकांना यात यश आले असले तरी दहशतवाद हा दिवसेंदिवस वाढतच आहे.पर्यटनही बंददेशाचे नंदनवन असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र, कर्फ्यू आणि लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय गेल्या वर्षभरापासून बंद आहे. यामुळे याठिकाणी बेरोजगारी वाढली आहे.वाट पाहावी लागेलपाकिस्तानला थेट युद्धात भारताला हरवणे कठीण असल्याने त्यांनी दहशवादाचा स्वीकार केला. येथील तरुणांना दहशतवादी प्रवृत्तींपासून परावृत्त करणे गरजेचे आहे. केंद्रशासित प्रदेशामुळे विकासाला वाव आहे. एका वर्षात याचे परिणाम दिसतील, असे म्हणणे योग्य होणार नाही. विकासासाठी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.-अता हसनेन,निवृत्त लेफ्टनंट जनरल

टॅग्स :Article 370कलम 370corona virusकोरोना वायरस बातम्याRam Mandirराम मंदिर