शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांपुढे अहंकारी सरकार झुकले, अशी आहे कायदा रद्द करण्याची प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 06:12 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका : निवडणुकांत पराभवाच्या भीतीमुळे रद्द केले कृषी कायदे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब यांसह आणखी काही राज्यांत पुढीलवर्षी विधानसभा निवडणुका होणार असून, त्यात आपल्याला पराभव पत्करावा लागेल, या भीतीपोटीच केंद्रातील मोदी सरकारने तीन कृषी कायदे रद्द केले आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.ते म्हणाले की, शेतकरी हे या देशाचे अन्नदाता आहेत. त्यांनी अन्यायाविरोधात जो लढा दिला, त्याच्यापुढे अहंकारी मोदी सरकारला झुकावे लागले. हा शेतकऱ्यांचा विजय आहे. सत्याग्रहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी हा विजय मिळविला आहे. अन्यायाविरुद्ध मिळविलेल्या या विजयाबद्दल शेतकऱ्यांचे राहुल गांधी यांनी अभिनंदन केले आहे.

आपल्या प्रतिक्रियेच्या शेवटी राहुल गांधी यांनी जय जवान, जय किसान ही घोषणाही उद्धृत केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधी यांनी कायम पाठिंबा दिला होता.

काय होते तीन कृषी कायदे?

१ पहिला कृषी कायदा हा कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) विधेयक २०२० होता. यामुळे शेतकरी त्याला हव्या त्या ठिकाणी त्याचे पीक विकू शकत होता. त्याला विनाअडथळा दुसऱ्या राज्यांतही पीक विकता व विकत घेता येत होते. कृषी उत्पादनांचा हा व्यापार राज्य सरकारांनी लावलेल्या मंडी करातून मुक्त केला गेला होता.२ दुसरा कृषी कायदा हा शेतकरी किमत हमी आणि कृषी सेवा अधिनियम २०२० होता. त्यानुसार शेतकऱ्यांना करारावर शेती करणे आणि आपल्या पिकाचे विपणन करण्याची अनुमती देणारा होता. ३ तिसरा कायदा हा आवश्यक वस्तु (संशोधन) अधिनियम होता.  असाधारण स्थिती वगळता व्यापारासाठी खाद्यान्न, दाळ, खाद्य तेल आणि कांद्यासारख्या वस्तुंवरील साठा मर्यादा काढून टाकली गेली.

अशी आहे कायदा रद्द करण्याची प्रक्रियाn    संसदेच्या सभागृहामध्ये नवा कायदा करताना व तो कायदा रद्द करतानाची प्रक्रिया सारखीच असते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तीन कृषी कायदे रद्द करण्याबाबतचे विधेयक लोकसभेत व त्यानंतर राज्यसभेत मंजूर करून घेतल्यानंतरच तो निर्णय अमलात येईल. संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. ते २३ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे.n    सातव्या, आठव्या, नवव्या लोकसभेचे सेक्रेटरी जनरल सुभाष कश्यप यांनी सांगितले की, नवीन कृषी कायदे रद्द करण्याबाबतचे सुधारित विधेयक लोकसभेत मांडण्यात येईल. जशी अन्य विधेयकांवर होते तशीच याविधेयकावरही लोकसभेत चर्चा होईल. त्यानंतर सभागृहात मतदान घेऊन हे विधेयक मंजूर करण्याची प्रक्रिया पार पडेल. अशीच प्रक्रिया राज्यसभेतही पार पडेल. त्यानंतरच तीन कृषी कायदे रद्द झाल्याचा निर्णय लागू होईल.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदी