शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
2
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
3
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
4
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
5
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
6
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
7
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
8
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
9
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
10
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
11
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
12
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
13
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
14
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
15
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
16
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
17
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
18
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
19
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल

शेतकऱ्यांपुढे अहंकारी सरकार झुकले, अशी आहे कायदा रद्द करण्याची प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 06:12 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका : निवडणुकांत पराभवाच्या भीतीमुळे रद्द केले कृषी कायदे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब यांसह आणखी काही राज्यांत पुढीलवर्षी विधानसभा निवडणुका होणार असून, त्यात आपल्याला पराभव पत्करावा लागेल, या भीतीपोटीच केंद्रातील मोदी सरकारने तीन कृषी कायदे रद्द केले आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.ते म्हणाले की, शेतकरी हे या देशाचे अन्नदाता आहेत. त्यांनी अन्यायाविरोधात जो लढा दिला, त्याच्यापुढे अहंकारी मोदी सरकारला झुकावे लागले. हा शेतकऱ्यांचा विजय आहे. सत्याग्रहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी हा विजय मिळविला आहे. अन्यायाविरुद्ध मिळविलेल्या या विजयाबद्दल शेतकऱ्यांचे राहुल गांधी यांनी अभिनंदन केले आहे.

आपल्या प्रतिक्रियेच्या शेवटी राहुल गांधी यांनी जय जवान, जय किसान ही घोषणाही उद्धृत केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधी यांनी कायम पाठिंबा दिला होता.

काय होते तीन कृषी कायदे?

१ पहिला कृषी कायदा हा कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) विधेयक २०२० होता. यामुळे शेतकरी त्याला हव्या त्या ठिकाणी त्याचे पीक विकू शकत होता. त्याला विनाअडथळा दुसऱ्या राज्यांतही पीक विकता व विकत घेता येत होते. कृषी उत्पादनांचा हा व्यापार राज्य सरकारांनी लावलेल्या मंडी करातून मुक्त केला गेला होता.२ दुसरा कृषी कायदा हा शेतकरी किमत हमी आणि कृषी सेवा अधिनियम २०२० होता. त्यानुसार शेतकऱ्यांना करारावर शेती करणे आणि आपल्या पिकाचे विपणन करण्याची अनुमती देणारा होता. ३ तिसरा कायदा हा आवश्यक वस्तु (संशोधन) अधिनियम होता.  असाधारण स्थिती वगळता व्यापारासाठी खाद्यान्न, दाळ, खाद्य तेल आणि कांद्यासारख्या वस्तुंवरील साठा मर्यादा काढून टाकली गेली.

अशी आहे कायदा रद्द करण्याची प्रक्रियाn    संसदेच्या सभागृहामध्ये नवा कायदा करताना व तो कायदा रद्द करतानाची प्रक्रिया सारखीच असते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तीन कृषी कायदे रद्द करण्याबाबतचे विधेयक लोकसभेत व त्यानंतर राज्यसभेत मंजूर करून घेतल्यानंतरच तो निर्णय अमलात येईल. संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. ते २३ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे.n    सातव्या, आठव्या, नवव्या लोकसभेचे सेक्रेटरी जनरल सुभाष कश्यप यांनी सांगितले की, नवीन कृषी कायदे रद्द करण्याबाबतचे सुधारित विधेयक लोकसभेत मांडण्यात येईल. जशी अन्य विधेयकांवर होते तशीच याविधेयकावरही लोकसभेत चर्चा होईल. त्यानंतर सभागृहात मतदान घेऊन हे विधेयक मंजूर करण्याची प्रक्रिया पार पडेल. अशीच प्रक्रिया राज्यसभेतही पार पडेल. त्यानंतरच तीन कृषी कायदे रद्द झाल्याचा निर्णय लागू होईल.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदी