शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

...तर आरोपींना मुक्त करा! कारणे न देता केलेली अटक अवैध; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 09:07 IST

ही औपचारिकता नसून अनिवार्य घटनात्मक प्रक्रिया, पूर्तता नसल्यास आरोपींना मुक्त करा, कोर्टाचे आदेश

डॉ. खुशालचंद बाहेती नवी दिल्ली - अटकेचे कारण समजणे घटनेच्या अनुच्छेद २२(१) नुसार अटक केलेल्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे.  रिमांडच्या वेळी याच्या पूर्ततेची खात्री करणे दंडाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे अटकेचे कारण न दिल्यास ती अवैध ठरते, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. 

विहान कुमारला १० जून २०२४ रोजी फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने अटक करताना त्यामागची कारणे लेखी दिली नाहीत म्हणून ही अटक बेकायदेशीर ठरविण्याची विहान कुमारची मागणी फेटाळली होती. सुप्रीम कोर्टाचे  न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि एन. कोटीश्वर सिंग यांनी या विरोधातील अपील मान्य करून अटक बेकायदेशीर घोषित केली. सुप्रीम कोर्ट म्हणाले, अटकेची माहिती व कारणे कळविणे औपचारिकता नसून अनिवार्य घटनात्मक आवश्यकता आहे.

सुप्रीम कोर्ट काय म्हणाले ?१. अटकेचे कारण आरोपीला समजेल त्या भाषेत दिले पाहिजे.२. आरोपींनी याचे पालन न केल्याचा आरोप केल्यास अनुपालन सिद्ध करण्याची जबाबदारी तपास अधिकाऱ्यांवर आहे. ३. अटक केल्याची माहिती आणि अटकेची  कारणे वेगवेगळी द्यावी.  तपास अधिकाऱ्याला दोन्हींचे पालन करणे बंधनकारक आहे. 

भंग झाल्यास काय ?आरोपीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन ठरते. व्यक्तीची अटक आणि पुढील रिमांड आदेश बेकायदा ठरतात. तपास, चार्जशीट आणि खटला बेकायदा ठरत नाही. परंतु, आरोपपत्र दाखल केल्याने अटक वैध ठरत नाही.

दंडाधिकाऱ्यांचे कर्तव्य रिमांडसाठी हजर करताना अनुपालन झाल्याची खात्री करापालन नसल्यास आरोपींना सोडण्याचे आदेश देणे. जामीन मंजूर करण्यावर वैधानिक निर्बंध असले तरी या कारणास्तव जामीन मंजूर करता येईल. 

हे दडवणे बेकायदाअटक केलेल्या व्यक्तीचे मित्र, नातेवाईक किंवा नामनिर्देशित व्यक्तींना अटक आणि आरोपीना कोठे ठेवण्यात आले आहे, याची माहिती न देणे घटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते.  यामुळे अटक बेकायदेशीर ठरते.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक