शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

अग्निपथ योजना आजची नाही, १९८९ पासून त्यावर काम; सैन्य दलाची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 15:44 IST

सैन्याने आज एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सैन्य दलाला तरुण वर्गाची गरज आहे. सध्या सैन्यातील जवानांचे सरासरी वय हे ३२ वर्षे आहे. ते आम्हाला कमी करून २६ वर आणायचे आहे, असे सांगितले.

अग्निपथ योजनेवरून देशभरात वातावरण संतप्त झालेले असताना सैन्य दलांनी ही योजना मागे घेणार नाही, अशी घोषणा केली आहे. अग्निपथ ही योजना आजची नाही, तर या योजनेचा विचाक १९८९ मध्येच करण्यास सुरुवात झाली होती. ही योजना लागू करण्यासाठी परदेशातील सैन्यातील नियुक्त्या आणि तेथील एक्झिट प्लॅनबाबत पूर्ण अभ्यास करण्यात आला आहे, असे डीएमएचे अतिरिक्त सेक्रेटरी अनिल पुरी यांनी सांगितले. 

सैन्याने आज एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सैन्य दलाला तरुण वर्गाची गरज आहे. सध्या सैन्यातील जवानांचे सरासरी वय हे ३२ वर्षे आहे. ते आम्हाला कमी करून २६ वर आणायचे आहे. तरुणच सर्वाधिक जोखिम घेऊ शकतात हे आम्हालाही माहिती आहे. 

सध्याच्या जवानांना जे जे काही मिळते ते सर्व अग्निपथच्या अग्निवीरांना देण्यात येणार आहे. सेवा शर्तींमध्ये त्यांच्यासोबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. सैन्याचे जवान जे कपडे घालतात तेच त्यांनाही दिले जाणार आहेत. सैन्याचे जवान ज्या मेसमध्ये जेवण, नाश्ता करतात तिथेच त्यांनाही मिळेल. जवानांसोबतच हे अग्निवीर राहणार आहेत, असेही पुरी यांनी सांगितले. 

चार पाच वर्षांत ५० ते साठ हजार सैनिक भरले जाणात आहेत. भविष्यात ही संख्या ९०००० ते १ लाख पर्यंत वाढविण्यात येईल. ४६००० अग्निवीरांची भरती ही विश्लेशन करण्यासाठी आम्ही उचललेले पहिले पाऊल आहे, असे ते म्हणाले. अग्निपथ योजना मागे घेण्याची कोणतीही शक्यता लष्कराने फेटाळून लावली आहे. अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नाही, असे लष्कराने संयुक्त निवेदनात म्हटले आहे. कोचिंग संस्था विद्यार्थ्यांना चिथावणी देत ​​आहेत, असे लष्कराने आपल्या महत्त्वपूर्ण निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Armyभारतीय जवान