शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषांसाठी जागा राखीव ठेवू शकत नाही; लष्कराचे 'आरक्षण' धोरण कोर्टाकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 10:33 IST

न्यायालयाने ही पद्धत मनमानी असून, संविधानातील समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करणारी आहे

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने भारतीय लष्कराच्या जज अॅडव्होकेट जनरल (जेएजी) भरतीतील पुरुषांसाठी सहा आणि महिलांसाठी तीन २:१ पदांचे आरक्षण असलेले धोरण रद्दबातल ठरविले. न्यायालयाने ही पद्धत मनमानी असून, संविधानातील समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे पुरुषांसाठी जागा राखीव ठेवू शकत नाही, स्पष्ट केले.

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला सर्व पात्र उमेदवारांसाठी, लिंगभेद न करता, एकत्रित गुणसूची तयार करण्याचे निर्देश दिले.

न्यायालयाने काय म्हटले?

कार्यकारी यंत्रणेला पुरुषांसाठी स्वतंत्रपणे पदे राखून ठेवण्याचा अधिकार नाही. ६ पुरुष व ३ महिलांची विभागणी ही मनमानी आहे. खऱ्या अर्थाने लिंग-निरपेक्षता म्हणजे सर्वांत गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होणे. महिलांच्या संख्येवर मर्यादा घालणे हे समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन होय.

प्रकरण काय ?

ही याचिका दोन महिला उमेदवारांनी दाखल केली होती. २०२३ च्या भरती अधिसूचनेनुसार जेएजी विभागातील पदे राखीव ठेवण्यात आली होती. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले की, दोन्ही महिलांनी गुणसूचीत चौथा आणि पाचवा क्रमांक मिळविला तरी लिंगाधारित आरक्षणामुळे त्यांना निवड मिळाली नाही. 

सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट २०२३ मध्ये नोटीस बजावून दोन पदे रिक्त ठेवण्याचे आदेश दिले होते. मे २०२५ मध्ये, निर्णय राखून ठेवताना, खंडपीठाने एका याचिकाकर्तीच्या दाव्याबाबत प्राथमिक समाधान व्यक्त करून तिच्या नियुक्तीचे आदेश दिले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानSupreme Courtसर्वोच्च न्यायालय