शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सायबर धमक्यांचा सामना करण्यास लष्कर सज्ज- बिपिन रावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 02:35 IST

सध्या चीनकडून अनेक देश आर्थिक मदत घेत आहेत. परंतु, त्या देशांना लवकरच कळेल की, काहीही फुकटात मिळत नसते. त्यासाठी कधी तरी किंमत मोजावीच लागते, असे भारतीय सैन्य दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी येथे सांगितले.

पुणे : सध्या चीनकडून अनेक देश आर्थिक मदत घेत आहेत. परंतु, त्या देशांना लवकरच कळेल की, काहीही फुकटात मिळत नसते. त्यासाठी कधी तरी किंमत मोजावीच लागते, असे भारतीय सैन्य दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी येथे सांगितले. तसेच भारताने सायबर धमक्यांना रोखण्यासाठी पुरेसे उपाय योजले आहेत. सायबर धमक्यांना सामोरे जाण्यासाठी आमच्याकडे योग्य यंत्रणा आहे. लष्कराला हळूहळू भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वाढवित आहे, असेही रावत यांनी सांगितले.‘बिम्सटेक’तर्फे औंध मिलिटरी स्टेशनवर पाच देशांचा संयुक्त युध्दसरावाचा समारोप रविवारी झाला. त्याप्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नेपाळ आणि चीनदरम्यान जवळीकवाढत आहे. त्याबाबत ते म्हणाले, ‘‘आर्थिक प्रगतीची इच्छा असलेल्या कोणत्याही देशाला सहकार्याचे द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय मार्ग शोधणे आवश्यक असते. चीन आर्थिक सत्ता असल्याने ते इतरांना मदत करीत आहे. परंतु, ज्या देशांनी ही मदत घेतली आहे, त्यांना लवकरच समजेल की, काहीही फुकट मिळत नाही. हे हितसंबंध केवळ तात्पुरते असतात. सामाजिक, आर्थिक संबंध हे बदलत असतात. त्याचे चांगले उदाहरण म्हणजे यूएस-पाकिस्तानचे संबंध. त्यांचे पूर्वीसारखे आता संबंध राहिलेले नाहीत. त्यामुळे चीन आणि इतर देशांमध्ये वाढत असलेल्या जवळकीबाबत भारताला चिंता नाही.’’जनरल रावत म्हणाले, नेपाळ आणि भूतानसारख्या देशांना भौगोलिक परिस्थितीमुळे इतर देशांकडे दुर्लक्ष करावे लागेल. भारत शेजारच्या देशांबरोबर राजकीय संबंध विकसित करण्याच्या दिशेने प्रयत्न करीत आहे. ‘नेबरहूड फर्स्ट अ‍ॅँड अ‍ॅक्ट ईस्ट’च्या धोरणानुसार भारत काम करीत आहे. त्याचा एक भाग म्हणजे बिम्सटेकचा युद्धसराव आहे.’’चीन उदयोन्मुख आर्थिक प्रतिस्पर्धीचीन भारताचा उदयोन्मुख आर्थिक प्रतिस्पर्धी आहे. दक्षिण पूर्व आशिया विभागात प्रभुत्व स्थापित करण्यासाठी दोन्ही देश एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत. भारताच्या आर्थिक प्रगतीमुळे दहशतवादाचा धोका कमी होईल, असे रावत म्हणाले.नोकरी मिळाल्यास स्थलांतर थांबेलभारतात बेकायदेशीर स्थलांतराबाबत रावत म्हणाले, स्थलांतर ही एक जागतिक घटना आहे. हे कोणत्याही विशिष्ट देशासाठी मर्यादित नाही. हे प्रत्येक प्रांतांमध्ये होत आहे आणि लोकांना चांगले काम आणि चांगल्या जीवनासाठी स्थलांतरित व्हावे लागते. चांगली नोकरी मिळाली, तर कोणीही स्थलांतरीत होणार नाही.’’

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानchinaचीनPakistanपाकिस्तानcyber crimeसायबर क्राइम