शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

सायबर धमक्यांचा सामना करण्यास लष्कर सज्ज- बिपिन रावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 02:35 IST

सध्या चीनकडून अनेक देश आर्थिक मदत घेत आहेत. परंतु, त्या देशांना लवकरच कळेल की, काहीही फुकटात मिळत नसते. त्यासाठी कधी तरी किंमत मोजावीच लागते, असे भारतीय सैन्य दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी येथे सांगितले.

पुणे : सध्या चीनकडून अनेक देश आर्थिक मदत घेत आहेत. परंतु, त्या देशांना लवकरच कळेल की, काहीही फुकटात मिळत नसते. त्यासाठी कधी तरी किंमत मोजावीच लागते, असे भारतीय सैन्य दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी येथे सांगितले. तसेच भारताने सायबर धमक्यांना रोखण्यासाठी पुरेसे उपाय योजले आहेत. सायबर धमक्यांना सामोरे जाण्यासाठी आमच्याकडे योग्य यंत्रणा आहे. लष्कराला हळूहळू भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वाढवित आहे, असेही रावत यांनी सांगितले.‘बिम्सटेक’तर्फे औंध मिलिटरी स्टेशनवर पाच देशांचा संयुक्त युध्दसरावाचा समारोप रविवारी झाला. त्याप्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नेपाळ आणि चीनदरम्यान जवळीकवाढत आहे. त्याबाबत ते म्हणाले, ‘‘आर्थिक प्रगतीची इच्छा असलेल्या कोणत्याही देशाला सहकार्याचे द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय मार्ग शोधणे आवश्यक असते. चीन आर्थिक सत्ता असल्याने ते इतरांना मदत करीत आहे. परंतु, ज्या देशांनी ही मदत घेतली आहे, त्यांना लवकरच समजेल की, काहीही फुकट मिळत नाही. हे हितसंबंध केवळ तात्पुरते असतात. सामाजिक, आर्थिक संबंध हे बदलत असतात. त्याचे चांगले उदाहरण म्हणजे यूएस-पाकिस्तानचे संबंध. त्यांचे पूर्वीसारखे आता संबंध राहिलेले नाहीत. त्यामुळे चीन आणि इतर देशांमध्ये वाढत असलेल्या जवळकीबाबत भारताला चिंता नाही.’’जनरल रावत म्हणाले, नेपाळ आणि भूतानसारख्या देशांना भौगोलिक परिस्थितीमुळे इतर देशांकडे दुर्लक्ष करावे लागेल. भारत शेजारच्या देशांबरोबर राजकीय संबंध विकसित करण्याच्या दिशेने प्रयत्न करीत आहे. ‘नेबरहूड फर्स्ट अ‍ॅँड अ‍ॅक्ट ईस्ट’च्या धोरणानुसार भारत काम करीत आहे. त्याचा एक भाग म्हणजे बिम्सटेकचा युद्धसराव आहे.’’चीन उदयोन्मुख आर्थिक प्रतिस्पर्धीचीन भारताचा उदयोन्मुख आर्थिक प्रतिस्पर्धी आहे. दक्षिण पूर्व आशिया विभागात प्रभुत्व स्थापित करण्यासाठी दोन्ही देश एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत. भारताच्या आर्थिक प्रगतीमुळे दहशतवादाचा धोका कमी होईल, असे रावत म्हणाले.नोकरी मिळाल्यास स्थलांतर थांबेलभारतात बेकायदेशीर स्थलांतराबाबत रावत म्हणाले, स्थलांतर ही एक जागतिक घटना आहे. हे कोणत्याही विशिष्ट देशासाठी मर्यादित नाही. हे प्रत्येक प्रांतांमध्ये होत आहे आणि लोकांना चांगले काम आणि चांगल्या जीवनासाठी स्थलांतरित व्हावे लागते. चांगली नोकरी मिळाली, तर कोणीही स्थलांतरीत होणार नाही.’’

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानchinaचीनPakistanपाकिस्तानcyber crimeसायबर क्राइम