शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मणिपूरमध्ये आर्मी झाली सक्रीय! फुटीरतावाद्यांचे १२ बंकर, मोर्टार, आईडी केले उध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 10:06 IST

लष्कर कारवाईसाठी गेले असता त्या त्या गावातील गावकरी, महिला या उग्रवाद्यांना वाचवत आहेत. तरीही प्रसंगावधान राखून लष्कर कारवाई करत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूर धुमसत आहे. दोन समाजामध्ये आरक्षणावरून झालेला वाद हिंसक झाला आहे. एकमेकांवर जिवघेणे हल्ले, गोळीबार, स्फोट घटविले जात आहेत. असे असताना आता भारतीय लष्कराने पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या २४ तासांत फुटीरतावाद्यांचे १२ बंकर उध्वस्त करण्यात आले आहे. 

लष्कर कारवाईसाठी गेले असता त्या त्या गावातील गावकरी, महिला या उग्रवाद्यांना वाचवत आहेत. तरीही प्रसंगावधान राखून लष्कर कारवाई करत आहे. राज्य पोलीस आणि केंद्रीय दलाने तामेंगलाँग, इम्फाळ पूर्व, बिष्णुपूर, कांगपोकपी, चुराचंदपूर आणि काकचिंग जिल्ह्यांमध्ये शोध मोहीम राबवली. यावेळी १२ बंकर उध्वस्त करण्यात आले. 

साहुमफाई गावातील एका भातशेतीत पोलिसांना तीन 51 मिमी मोर्टार शेल, तीन 84 मिमी मोर्टार आणि आयईडी सापडले. आईडी नष्ट करण्यात आले आहेत. कर्फ्यूचे उल्लंघन, घरांमध्ये चोरी, जाळपोळ अशा गुन्ह्यांत 135 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत एकूण 1100 शस्त्रे, 13702 दारूगोळा आणि विविध प्रकारचे 250 बॉम्ब जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

काय आहे वाद...मणिपुरमध्ये आरक्षणावरून कोकी कुकी आणि मैतेई समाजामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसक संघर्ष सुरु आहे. दोन समुदायांमध्ये 3 मे रोजी पहिला संघर्ष झाला, त्यानंतर राज्याच्या विविध भागात सातत्याने हिंसाचार होत आहे. जातीय हिंसाचारात आतापर्यंत सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरच्या लोकसंख्येपैकी सुमारे 53% लोक मेईतेई समुदायातील आहेत, जे इम्फाळ खोऱ्यात राहतात. तर, आदिवासी-नागा आणि कुकी लोकसंख्येच्या 40 टक्के आहेत आणि ते डोंगराळ भागात राहतात. जवळपास दोन महिने मणिपूर धुमसत आहे.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार