शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Army Chief MM Naravane: “संघर्ष हा शेवटचा पर्याय, तो झाला तर विजय आमचाच”; लष्करप्रमुख नरवणे यांनी थेट सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 17:09 IST

Army Chief MM Naravane: दहशतवादाच्या मुद्द्यावरुन लष्करप्रमुख नरवणे यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवासंपासून भारत-चीन सीमावादावरील तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या असून, दुसरीकडे पाकिस्तानच्या कुरापती वाढताना दिसत आहे. भारताच्या या दोन्ही सीमांवरील सद्य परिस्थितीबाबत देशाचे लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी माहिती दिली. दहशतवादाच्या मुद्द्यावरून लष्करप्रमुख नरवणे यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला असून, कारवाईसाठी भाग पाडल्यास मोठी किंमत वसूल करू, असे नरवणे यांनी स्पष्टपणे सांगितले. 

भारत आणि चीन सीमावादावरून दोन्ही देशांदरम्यान १४ वी सैन्यस्तरावरील चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेमध्ये लष्करप्रमुख नरवणे हेही सहभागी झाले होते. यानंतर नरवणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सीमाभागातील घुसघोरी आणि पाकिस्तान, तसेच चीनसोबतचे भारताचे संबंध याविषयी भूमिका स्पष्ट केली.

आम्ही दहशतवाद खपवून घेणार नाही

पश्चिमेकडील सीमाभागात, विशेषत: नियंत्रण रेषेजवळ बराच काळ परिस्थिती तणावपूर्ण होती. सध्या परिस्थितीत सुधारणा होत आहे. पण तरीही या भागात दहशतवादी कारवाया वाढू लागल्या असून, नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पश्चिमेकडील शेजारी देशाचे सुप्त मनसुबे यातून उघड होत आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही. पण आम्ही दहशतवाद खपवून घेणार नाही. जर आम्हाला भाग पाडण्यात आले, तर याची गंभीर किंमत वसूल केली जाईल, या शब्दांत नरवणे यांनी परखडपणे सुनावले आहे. 

संघर्ष हा शेवटचा पर्याय, तो झाला तर विजय आमचाच

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून उत्तर आणि पश्चिमेकडच्या सीमाभागात सकारात्मक घडामोडी घडत आहेत. एकीकडे आम्ही चर्चेच्या मार्गाने शांतता आणण्याचा प्रयत्न करत असतानाच उत्तरेकडच्या सीमारेषेवर भारतीय लष्कर कोणत्याही प्रकारच्या कारवाईसाठी सज्ज आहे. संघर्ष हा शेवटचा पर्याय असून, तो झालाच तर त्यात विजय आमचाच असेल, असेही नरवणे यांनी नमूद केले. 

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान