शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
9
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
12
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
13
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
14
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
15
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
16
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
17
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
18
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
19
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
20
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज - मनोज नरवणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 12:20 IST

'देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहू. आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज आहे.'

नवी दिल्ली - जनरल बिपीन रावत यांच्या निवृत्तीनंतर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नरवणे यांनी नॅशनल वॉर मेमोरिअलला भेट दिली. देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहू. आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज आहे. देशाच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. तसेच मानवाधिकारांच्या रक्षणासाठी विशेष काम करणार असल्याचं मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटलं आहे.

'माझी जबाबदारी अधिक योग्यरित्या पेलता यावी यासाठी शक्ती आणि साहस देण्याची मी देवाकडे प्रार्थना करत आहे. लष्कर, नौदल आणि हवाईदल देशाच्या सुरक्षेसाठी तयार आहेत. आम्ही मानवाधिकारांच्या रक्षणासाठी विशेष काम करणार आहोत. देशाच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. देशाच्या सीमा जेव्हा सुरक्षित असतील तेव्हाच देश प्रगती करेल' असं नरवणे यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

'आम्ही आमची क्षमता अधिक वाढवणार आहोत. जवान हे देश सुरक्षित ठेवतील. लष्करी कारवाईसाठी सदैव तत्पर राहणं हे आमचं प्राधान्य असेल' असं देखील नरवणे यांनी म्हटलं आहे. शेजारच्या देशाने दहशतवादाला खतपाणी देणे थांबवले नाही, तर दहशतवादाचा उगम जेथून होतो तेथे हल्ला करण्याचा हक्क भारताने राखून ठेवला आहे, अशा कठोर शब्दांत  लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पाकिस्तानला मंगळवारी (31 डिसेंबर) इशारा दिला होता. 

वृत्त संस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत जनरल नरवणे म्हणाले की, सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला त्याची जागा दाखवणारी खंबीर व्यूहरचना विकसित केली गेलेली आहे. सरकारचाच पाठिंबा असलेल्या दहशतवादावरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने केलेले सगळे प्रयत्न पूर्णपणे फसले असून, कलम ३७० रद्द झाल्यापासून काश्मीरमधील परिस्थितीत लक्षणीयरित्या सुधारणा झाली आहे, असे नरवणे म्हणाले.

सप्टेंबर 2018 मध्ये मनोज नरवणेंकडे पूर्व मुख्यालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. लष्कराच्या दृष्टीनं पूर्व मुख्यालयाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. चीनला लागून असलेल्या जवळपास 4 हजार किलोमीटर सीमेचं संरक्षण करण्याची जबाबदारी पूर्व मुख्यालयाकडे असते. त्यामुळे या पदाची धुरा खांद्यावर घेतल्यापासूनच नरवणेंचं नाव लष्करप्रमुख पदाच्या शर्यतीत होतं.

आपल्या 37 वर्षांच्या सेवाकाळात मनोज नरवणेंनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. जवळपास सर्वच परिस्थितींमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. जम्मू-काश्मीर आणि ईशान्येच्या राज्यांमधील आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स बटालियनचं यशस्वी नेतृत्त्व त्यांनी केलं आहे. श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या पथकातही त्यांनी उल्लेखनीय काम केलं. याशिवाय म्यानमारमधील दूतावासातही त्यांनी तीन वर्ष महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. 

नरवणे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण 'ज्ञानप्रबोधिनी'त झालं आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते जून 1980 '7 सीख लाइट इन्फंट्री'मधून लष्करात रूजू झाले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे 'इन्स्पेक्टर जनरल', स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील 'जनरल ऑफिसर इन कमांडिंग', लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू स्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांवर काम करताना त्यांनी ठसा उमटवला. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारत