शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पाक व्याप्त काश्मीरमधील हालचालींवर करडी नजर; LOC वरून बिपीन रावत यांनी केली पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 19:27 IST

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे.

श्रीनगर - भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी रावत यांनी नियंत्रण रेषेवरून पाक व्याप्त काश्मीरमधील स्थितीचा आढावा घेतला. हातात दूरबीन पकडून त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींवर नजर ठेवली. शुक्रवारी काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेचा आढावा घेऊन सीमेवर तैनात असलेल्या जवानांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पाकिस्तानच्या नापाक हरकती आणि घुसखोरांना रोखण्यासाठीची रणनीती यावर चर्चा केली. 

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून सीमेवर हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरोधात कुटनीतीचा अवलंब करत आहे. मात्र चीनशिवाय कोणताही देश पाकिस्तानच्या मागे उभे राहताना दिसत नसल्याने पाकिस्तान सैरभैर झाला आहे. 

पाकच्या मंत्र्यांपासून ते पंतप्रधान इम्रान खान यांच्यापर्यंत अनेकजण भारतासोबत युद्धाची भाषा बोलू लागलेत. तर जगाने काश्मीरकडे लक्ष दिले नाही तर भारत-पाक युद्धाचे परिणाम जगाला भोगावे लागतील अशा पोकळ धमक्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देत आहेत. एकंदर या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर सतर्क असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे असा संदेश भारतीय लष्कराकडून दिला जात आहे. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी भारतीय जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकच्या नापाक हरकती रोखण्यासाठी जवानांना मार्गदर्शन केले. 

 

त्याचसोबत श्रीनगरमधील लष्कराच्या मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक बोलविण्यात आली. त्यात दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालींवर भारताची करडी नजर आहे. दहशतवाद्यांना फणा काढू नये यासाठी भारतीय लष्कराकडून त्यांच्यावर दबाव कायम ठेवण्यात आला आहे. तसेच लोकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्यक्रमही लष्कराकडून आयोजित करण्यात आले आहे. 

तर दुसरीकडे पाकिस्तानने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आर्थिक निधीसाठी प्रस्ताव ठेवला आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार अमेरिका जेवढा खर्च अफगाणिस्तानावर करते, त्याचा निम्मा खर्च पाकिस्तानला दिला तर अफगाणिस्तानात शांतता राखण्याची गॅरंटी पाकिस्तान घेईल असं सांगण्यात आलं आहे त्यामुळे भारताने अधिकाधिक सतर्कता पाळण्याचं ठरवलं आहे.  

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी