शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

लष्कराने बदलली अग्निवीर भरती प्रक्रिया; आधी लेखी परीक्षा, मग शारीरिक चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 07:42 IST

लष्कराच्या भरतीदरम्यान प्रचंड गर्दी हाेते. त्यासाठी लष्कराला बरीच तयारी करावी लागते. त्यामुळे आधी लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. 

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने अग्निपथ याेजनाेंतर्गत अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत बदल केला आहे. आता सर्वप्रथम लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. त्यानंतरच शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.आतापर्यंतच्या प्रक्रियेत सर्वप्रथम शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी घेतली जात हाेती. त्यात यशस्वी ठरलेल्या उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेण्यात यायची. आता ही प्रक्रिया बदलणार आहे. लवकरच नव्या प्रक्रियेनुसार अग्निवीर बनण्यासाठी नाेंदणी सुरू करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी लष्करात अग्निवीरांची भरती सुरू करण्यात आली हाेती. 

४०,००० अग्निवीरांची भरती झाली गेल्या वर्षीनाैदलानेही प्रक्रिया बदलली : नाैदलनेही अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत बदल केला आहे. आधी ऑनलाइन प्रवेश परीक्षा हाेईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना मेरिट आधारे प्रक्रियेसाठी बाेलाविण्यात येईल.

बदल कशामुळे?लष्कराच्या भरतीदरम्यान प्रचंड गर्दी हाेते. त्यासाठी लष्कराला बरीच तयारी करावी लागते. त्यामुळे आधी लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. 

परीक्षा हाेणार ऑनलाइन -अग्निवीरांची लेखी परीक्षा ऑनलाइन हाेईल. त्यासाठी विविध ठिकाणी असलेल्या नामांकित केंद्रावर उमेदवारांना जाता येईल. परिणामी एकाच ठिकाणी माेठी गर्दी हाेणार नाही. ही परीक्षा ६० मिनिटांची राहणार आहे. त्यानंतर मेरिटनुसार पुढील प्रक्रियेसाठी बाेलाविण्यात येईल. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलindian navyभारतीय नौदल