शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

२० लाखांसाठी आर्मी कॅप्टन भूपिंदर सिंहने रचलं मोठं षडयंत्र; जाणून घ्या, ‘त्या’ दिवशी काय घडलं?

By प्रविण मरगळे | Updated: January 11, 2021 09:48 IST

सोशल मीडियात हे समोर आलं की, या तीन युवकांचा दहशतवादाची काहीही संबंध नाही, तेव्हा लष्कराने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले

ठळक मुद्देहे प्रकरण १८ जुलै २०२० मध्ये अम्शीपुरा चकमकीसंदर्भात आहे.ज्यात राजौरी जिल्ह्यातील तीन युवक इम्तियाज अहमद, अबरार अहमद आणि मोहम्मद इबरार यांना ठार करण्यात आलं.अम्शीपुरामध्ये मारल्या गेलेले तीन युवकांची ओळख पटवून त्यांचे मृतदेह ऑक्टोबरमध्ये बारामूला येथील त्यांच्या कुटुंबांना सोपवण्यात आले.

जम्मू – शोपियानमध्ये मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या कथित चकमकीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्मी कॅप्टने २० लाखांच्या बक्षिसासाठी दोन लोकांसोबत मिळून षडयंत्र रचलं. या बनावट चकमकीत ३ युवकांना मारण्यात आलं, या आरोपात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सैनिकांनी घेरण्यापूर्वीच कॅप्टने या युवकांना गोळी मारली होती. सध्या कॅप्टन भूपिंदर सिंह अटकेत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार आर्मी कॅप्टन भूपिंदर सिंह यांचे कोर्ट मार्शल होऊ शकते. हे प्रकरण १८ जुलै २०२० मध्ये अम्शीपुरा चकमकीसंदर्भात आहे. ज्यात राजौरी जिल्ह्यातील तीन युवक इम्तियाज अहमद, अबरार अहमद आणि मोहम्मद इबरार यांना ठार करण्यात आलं. या युवकांना दहशतवादी असल्याचं बोललं गेले. जिल्हा न्यायाधीशांसमोर पोलिसांच्या आरोपपत्रात या चकमकीत सहभागी तबीश नजीर आणि बिलाल अहमद लोन यांच्याही भूमिकेचा उल्लेख आहे. लोन हा सरकारी साक्षीदार बनला असून त्याचा जबाब न्यायाधीशांसमोर घेण्यात आला आहे.

सोशल मीडियात हे समोर आलं की, या तीन युवकांचा दहशतवादाची काहीही संबंध नाही, तेव्हा लष्कराने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले, ज्याचा तपास सप्टेंबरमध्ये पूर्ण झाला. अम्शीपुरामध्ये मारल्या गेलेले तीन युवकांची ओळख पटवून त्यांचे मृतदेह ऑक्टोबरमध्ये बारामूला येथील त्यांच्या कुटुंबांना सोपवण्यात आले. या प्रकरणात कॅप्टनवर प्रथमदर्शनी विशेषाधिकार नियमांचे उल्लंघन आणि लष्करी शिस्तभंग केल्यामुळे कारवाई सुरू करण्यात आली होती.

जनरल ऑफिसर इन कमांड लेफ्टनंट बी एस राजू म्हणाले की, समरी ऑफ एविंडस पूर्ण झाले असून लष्करी कायद्याप्रमाणे पुढील कारवाई होईल. अधिकाऱ्यांनी कॅप्टन भूपिंदर सिंहला १९९० च्या विशेषाधिकाराचं उल्लंघन करणे व लष्कर प्रमुख यांच्या आदेशाचे पालन न करणे यासाठी कोर्ट मार्शलच्या कारवाईचा सामना करावा लागू शकतो. जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणी ७५ साक्षीदार नोंदवले आहेत आणि पुरावा म्हणून आरोपींचे कॉल डेटा माहिती जोडण्यात आली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोन नागरिकांसोबत लष्कराचे पथक एकत्र निघाले होते, त्याठिकाणी दहशतवाद्यांशी सामना होऊ शकतो अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती. घटनास्थळी पोहचल्यानंतर सैनिकांना चारीबाजूने घेरण्यास सांगितले. सैनिकांच्या जबाबानुसार जेव्हा आम्ही वाहनातून उतरलो तेव्हा परिसरात घेराव टाकण्यापूर्वीच काही गोळ्यांचे आवाज ऐकू आले. तेव्हा कॅप्टन सिंहने सांगितले की, दहशतवादी पळण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे गोळ्या चालवाव्या लागल्या. आरोपपत्रानुसार कॅप्टन सिंह आणि इतर दोघांनी चकमकीचं नाटक बनवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. २० लाख रुपये बक्षिसासाठी हे नाटक रचलं गेले. वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती दिली गेली असंही गुन्ह्यात नमूद करण्यात आलं आहे.   

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी