शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

मिठाईवरून तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदारांमध्ये वादावादी, नेमकं घडलं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:27 IST

Trinamool Congress News: मिठाईवरून तृणमूल काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ खासदारांमध्ये वादावादी झाल्याची चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी आणि खासदार कीर्ती आझाद यांच्यामध्ये वादावादी झाल्याचा दावा केला होता.

मिठाईवरून तृणमूल काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ खासदारांमध्ये वादावादी झाल्याची चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी आणि खासदार कीर्ती आझाद यांच्यामध्ये वादावादी झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसमधील सूत्रांकडून या वादाबाबत आणखी माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार या संपूर्ण वादाची सुरुवात तृणमूल काँग्रेसच्या एका ज्येष्ठ खासदारामुळे झाली होती.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार खासदार कीर्ती आझाद यांना संसदेत संदेश नावाचं एक मिठाईचं दुकान सुरू करायचं होतं. त्यासाठी ते अर्ज करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कल्याण बॅनर्जी यांनी त्यांना रोखले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेमध्ये संदेश मिठाई नावाचं एक दुकान सुरू करण्यासाठी काही महिला खासदारांच्या स्वाक्षरीसह कीर्ती आझाद यांनी एक पत्र तयार केल्याची माहिती कल्याण बॅनर्जी यांना मिळाली. ही माहिती मिळताच कल्याण बॅनर्जी यांनी याला विरोध केला.

त्यानंतर ४ एप्रिल रोजी कल्याण बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सात ते आठ खासदारांच्या सहीसह एक मेमोरेंडम देण्याची योजना आखली. मात्र एका महिला खासदाराला जेव्हा यावर आपली स्वाक्षरी नसल्याचे समजले. तेव्हा त्यावरून वादालासुरुवात झाली. तृणमूल काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार कल्याण बॅनर्जी हे या महिला खासदारावर खूप नाराज आहेत. तर सदर महिला खासदारही कल्याण बॅनर्जी यांच्यावर  नाराज आहे. तसेच त्यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून याबाबतची तक्रार केली आहे.

दरम्यान, भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केलेल्या दाव्यानुसार पत्रक घेऊन जाणारा खासदार संसदेच्या बैठकीत सहभागी झाला नव्हता. तर तो थेट निवडणूक आयोगाकडे गेला. त्यामुळे दुसरा एक खासदार नाराज झाला. त्यामधून निवडणूक आयोगामध्येच दोघेही आमने-सामने आले. त्यानंतर त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. तसेच हे दोन्ही नेते एकमेकांवर ओरडू लागले. प्रकरण एवढं वाढलं की, एका खासदाराने तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मध्ये हस्तक्षेप करायला सांगितले. वाद खूपच वाढला, अखेरीस हे प्रकरण ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत पोहोचले. तसेच ममता बॅनर्जी यांनी दोन्ही खासदारांना शांत राहण्यास सांगितले, असा दावाही अमित मालवीय यांनी केला.  

टॅग्स :All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसParliamentसंसद