शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मिठाईवरून तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदारांमध्ये वादावादी, नेमकं घडलं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:27 IST

Trinamool Congress News: मिठाईवरून तृणमूल काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ खासदारांमध्ये वादावादी झाल्याची चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी आणि खासदार कीर्ती आझाद यांच्यामध्ये वादावादी झाल्याचा दावा केला होता.

मिठाईवरून तृणमूल काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ खासदारांमध्ये वादावादी झाल्याची चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी आणि खासदार कीर्ती आझाद यांच्यामध्ये वादावादी झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसमधील सूत्रांकडून या वादाबाबत आणखी माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार या संपूर्ण वादाची सुरुवात तृणमूल काँग्रेसच्या एका ज्येष्ठ खासदारामुळे झाली होती.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार खासदार कीर्ती आझाद यांना संसदेत संदेश नावाचं एक मिठाईचं दुकान सुरू करायचं होतं. त्यासाठी ते अर्ज करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कल्याण बॅनर्जी यांनी त्यांना रोखले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेमध्ये संदेश मिठाई नावाचं एक दुकान सुरू करण्यासाठी काही महिला खासदारांच्या स्वाक्षरीसह कीर्ती आझाद यांनी एक पत्र तयार केल्याची माहिती कल्याण बॅनर्जी यांना मिळाली. ही माहिती मिळताच कल्याण बॅनर्जी यांनी याला विरोध केला.

त्यानंतर ४ एप्रिल रोजी कल्याण बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सात ते आठ खासदारांच्या सहीसह एक मेमोरेंडम देण्याची योजना आखली. मात्र एका महिला खासदाराला जेव्हा यावर आपली स्वाक्षरी नसल्याचे समजले. तेव्हा त्यावरून वादालासुरुवात झाली. तृणमूल काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार कल्याण बॅनर्जी हे या महिला खासदारावर खूप नाराज आहेत. तर सदर महिला खासदारही कल्याण बॅनर्जी यांच्यावर  नाराज आहे. तसेच त्यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून याबाबतची तक्रार केली आहे.

दरम्यान, भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केलेल्या दाव्यानुसार पत्रक घेऊन जाणारा खासदार संसदेच्या बैठकीत सहभागी झाला नव्हता. तर तो थेट निवडणूक आयोगाकडे गेला. त्यामुळे दुसरा एक खासदार नाराज झाला. त्यामधून निवडणूक आयोगामध्येच दोघेही आमने-सामने आले. त्यानंतर त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. तसेच हे दोन्ही नेते एकमेकांवर ओरडू लागले. प्रकरण एवढं वाढलं की, एका खासदाराने तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मध्ये हस्तक्षेप करायला सांगितले. वाद खूपच वाढला, अखेरीस हे प्रकरण ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत पोहोचले. तसेच ममता बॅनर्जी यांनी दोन्ही खासदारांना शांत राहण्यास सांगितले, असा दावाही अमित मालवीय यांनी केला.  

टॅग्स :All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसParliamentसंसद