शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Jammu & Kashmir: काश्मीरमध्ये केवळ मुस्लिम राहतात का? अमित शहा यांनी दिले विरोधकांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 21:41 IST

गृह मंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये कलम 370 रद्द करण्याचे विधेयक मांडले. यानंतर त्यांनी राज्यसभेमध्ये चर्चेत भाग घेतला.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचेकलम 370 रद्द करण्याच्या प्रस्तावावर भाजपा व्होटबँकेचे, जातीयवादाचे राजकारण करत असल्याची टीका करण्यात येत आहे. मात्र, काश्मीरमध्ये केवळ मुस्लिमच राहतात का? तुम्हाला काय म्हणायचे आहे. काश्मीरमध्ये मुस्लिम, हिंदू, शीख, जैन, बुद्धिस्टही राहतात. जर 370 कलम चांगले असेल तर ते सर्वांसाठी चांगले आणि जर वाईट असेल तर सर्वांसाठी वाईटच असणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. 

गृह मंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये कलम 370 रद्द करण्याचे विधेयक मांडले. यानंतर त्यांनी राज्यसभेमध्ये चर्चेत भाग घेतला. आयुष्यमान भारत योजना राबविली पण काश्मीरमध्ये हॉस्पिटल कुठे आहेत? तेथे डॉक्टर, नर्स कुठे आहेत. जे काश्मीरमध्ये 35 ए कलमाला पाठिंबा देत आहेत त्यांनी जरा सांगावे की कोणता नावाजलेला डॉक्टर तेथे जाऊन सेवा देतो? तो डॉक्टर काश्मीरमध्ये घर घेऊ शकत नाही, ना ही जमीन. एवढेच नाही तर त्याची मुलेही तेथे मतदान करू शकत नाही. काश्मीरचा विकास कोणी थांबविला असेल तर तो याच 370 कलमाने, असे अमित शहा यांनी सांगितले. 

गुलाम नबी आझाद म्हणाले की, आंतरराज्य लग्ने होतात. पण त्या मुलींच्या अपत्यांना जम्मू काश्मीरमध्ये अधिकार मिळत नाहीत. तुम्ही या लग्नांवर खूश असाल, पण काश्मिरी लोक भारतात मिसळू शकत नाहीत, त्यांना खुलेपणे भारतीयांसोबत मिसळू द्या. विरोधक काश्मीरमध्ये रक्तपात घडेल अशा संसदेत धमक्या देत आहात. तुम्हाला काश्मीरमधील लोकांना काय संदेश देऊ इच्छित आहात. त्या लोकांना 21 व्या शतकामध्ये जगण्याचा अधिकार नाही का? त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी भारतातील विद्यापीठांमध्ये जावे लागते. ते विद्यार्थी लंडन, अमेरिकेमध्ये शिकू शकत नाहीत का, असा सवालही शहा यांनी केला. 

370 कलम हे तात्पुरते होते हे सर्वजण मान्य करतात. मात्र, तात्पुरते म्हणजे 70 वर्षे का? जवारलाल नेहरू म्हणाले होते की, 370 कलम घासून घासून संपेल. मात्र ते संपले नाही. जपून ठेवण्य़ात आल्याचे शहा म्हणाले. 

टॅग्स :Article 370कलम 370Article 35 Aकलम 35-एAmit Shahअमित शहाJammu Kashmirजम्मू-काश्मीर