शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
5
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
6
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
7
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
8
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
9
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
10
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
11
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
12
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
13
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
14
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
15
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
16
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
17
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
18
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
19
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
20
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...

निवड होऊनही नियुक्तीसाठी वणवण

By admin | Updated: January 19, 2017 05:46 IST

पोलीस शिपाई भरतीत निवड होऊनही लाल फितीच्या कारभारामुळे वाशिमच्या तरुणाची गेली दोन वर्षे वणवण सुरू आहे.

मुंबई : पोलीस शिपाई भरतीत निवड होऊनही लाल फितीच्या कारभारामुळे वाशिमच्या तरुणाची गेली दोन वर्षे वणवण सुरू आहे. नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असतानाच, गृह विभागाने राज्यातील जिल्ह्यांतील अशी दप्तर दिरंगाईच्या प्रकरणाची माहिती मागविली आहे. या माहितीनंतर एकदंरीत प्रकरणे मार्गी लावणार आहे. नियुक्तीचे स्वप्न आणखीन लांबणीवर गेल्याने याउमेदवाराच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे न्याय मिळणार की नाही? असा प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा आहे. वाशिम जिल्ह्याच्या वरुड खुर्दमध्ये राहणारा विठ्ठल सीताराम सुर्वे. वृद्ध आईवडील आणि गतिमंद भावाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. पार्ट टाईम नोकरी करून शिक्षण पूर्ण केले. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बांधून त्याने २०१४मध्ये पोलीस शिपाई भरतीत उडी घेतली. २० जून, २०१४च्या वाशीम पोलीस अधीक्षक कार्यालय येथे लागलेल्या अंतिम गुणवत्ता यादीत तो ओबीसीतून (इतर मागासवर्गीय प्रवर्ग) १७६ गुणांसह प्रतीक्षा यादीत प्रथम क्रमांकावर होता. निवड यादीतील राजेश केशव देवळे याने इतर ठिकाणी नोकरी लागल्याने स्वत:ची निवड रद्द करण्याचा अर्ज केला. त्यामुळे सुर्वे त्या ठिकाणी पात्र ठरला. मात्र, त्याची दखल घेणे कोणी गरजेचे समजले नाही. १५ महिन्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून त्याची पोलीस शिपाईपदी निवड झाल्याचे सांगण्यात आले. उशिरा का होईना प्रशासनाने दखल घेतली म्हणून सुर्वे कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला. वैद्यकीय चाचणी आणि चारित्र्य पडताळणी झाली. दोन्हींमध्ये पात्र असतानाही नियुक्ती मिळाली नाही. याच काळात अधीक्षक बदलले. नवीन आलेल्या अधीक्षकांनी त्यांना ३० मार्च, २०१६ रोजी पत्र पाठवून प्रतीक्षा यादीचा कालावधी १ वर्षाचा असून, त्यात ३ महिने २८ दिवस उशीर झाल्याचे सांगून नियुक्तीस पात्र नसल्याचे सांगितले. प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभाराचा आपल्याला फटका का? असा सवाल सुर्वे कुटुंबीय करत आहेत. २०१६ उलटून २०१७ सुरू झाले. मात्र, अजूनही त्याची नियुक्तीसाठीची धडपड सुरू आहे. (प्रतिनिधी)। अप्पर पोलीस महासंचालकांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात सामान्य प्रशासन विभागाकडूनही अभिप्राय घेण्यात आला. त्या अभिप्रायात ‘सदर कालमर्यादा नियम पोलीस भरतीकरिता लागू होत नाही,’ असे नमूद करण्यात आल्याचे समजते.त्यामुळे ज्या नियमांच्या आधारे मला डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे तो चुकीचा असल्याचे सुर्वेचे म्हणणे आहे. नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. नियुक्तीची स्वप्ने पुन्हा रंगवित असतानाच गृहविभागाच्या अनोख्या न्यायामुळे त्याच्या अडचणीत भर पाडली आहे.न्याय न मिळाल्यास सुर्वेने आत्महत्येचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन याकडे काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते संपर्कात येऊ शकले नाहीत.