शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

राममंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी मोहन भागवत यांना नियुक्त करा; मागणीसाठी अयोध्येत उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 10:08 IST

आरएसएसची विचारधारा राष्ट्रवादी आहे. त्यामुळे संघप्रमुखांचा सन्मान व्हायला हवा. आताचे अध्यक्ष परासरन चांगले व्यक्ती आहे. मात्र ट्रस्टच्या अध्यक्षपदी भागवतच पाहिजे, असंही दास यांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या वतीने आयोध्येतील राम मंदिर ट्रस्टची स्थापन करण्यात आली असून यावर सदस्य आणि अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्त्यावरून आता नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या विरोधात आंदोलनही सुरू करण्यात आले आहे. 15 सदस्यीय ट्रस्टच्या अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला असून सरसंघचालक मोहन भागवत यांना अध्यक्षपदी नियुक्त करण्याची मागणी होत आहे. यासाठी आयोध्येतील संतांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. 

केंद्र सरकारने गठीत केलेल्या 15 सदस्यीय समितीत 9 सदस्य स्थायी आणि सहा सदस्य नियुक्त केलेले असणार आहे. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी के. परासरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या तपस्वी छावणीचे संत महंत परमहंस दास यांनी उपोषण सुरू केले आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना अध्यक्षपदी विराजमान करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

बिलारीडीह येथे दास यांनी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत भागवत यांना ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात येत नाही, तोपर्यंत आपण उपोषण करणार असल्याचे दास यांचे म्हणणे आहे. आरएसएसची विचारधारा राष्ट्रवादी आहे. त्यामुळे संघप्रमुखांचा सन्मान व्हायला हवा. आताचे अध्यक्ष परासरन चांगले व्यक्ती आहे. मात्र ट्रस्टच्या अध्यक्षपदी भागवतच पाहिजे, असंही दास यांनी म्हटले आहे.