शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मोदी, नितीशकुमारांच्या फोटोवरून पीटीआयने मागितली स्मृती इराणींची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 11:51 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा मुखवटा घातलेल्या एका ग्रुपचा फोटो शेअर करणं ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला महागत पडलं आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा मुखवटा घातलेल्या एका ग्रुपचा फोटो शेअर करणं ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला महागत पडलं आहे.माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ‘पीटीआय’च्या या फोटोंवर आक्षेप घेतल्यानंतर ते फोटो पीटीआयने डिलिट केले आहेत. फोटो शेअर केल्याने पीटीआयने स्मृती इराणींची माफीही मागितली आहे.

नवी दिल्ली, दि. 7- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा मुखवटा घातलेल्या एका ग्रुपचा फोटो शेअर करणं  ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ (पीटीआय) या वृत्तसंस्थेला महागात पडलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ‘पीटीआय’च्या या फोटोंवर आक्षेप घेतल्यानंतर ते फोटो पीटीआयने डिलिट केले आहेत. हे फोटो शेअर केल्याने पीटीआयने स्मृती इराणींची माफीही मागितली आहे. जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागत असल्याचं पीटीआयने ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

नितीश कुमार यांनी केंद्राकडे निधीची मागणी केली होती. या बातमीचं ट्विट पीटीआयने केलं होतं. हे ट्विट करताना पीटीआयने नरेंद्र मोदी आणि नितीशकुमारांचा मुखवटा घातलेली मंडळी फ्रेंडशिप डे साजरा करतानाचा फोटो शेअर केला. पण हा फोटो माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना आवडला नाही. हा फोटो शेअर केल्यानंतर स्मृती इराणी यांनी ट्विटरवरच ‘पीटीआय’ला खडे बोल सुनावले. जनतेने निवडून दिलेल्या नेत्यांची तुम्ही अशी प्रतिमा निर्माण करणार का, ही तुमची अधिकृत भूमिका आहे का असा सवाल त्यांनी विचारला. यानंतर पीटीआयने भावना दुखावल्याबद्दल स्मृती इराणींची माफी मागितली आणि फोटो डिलीट केले आहेत.

पण यावर नेटीझन्सने मात्र नाराजी व्यक्त केली. मुखवटा घातलेल्या फोटोमध्ये आक्षेपार्ह काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. गौरव पांधी या युजरने पीटीआयचे ते फोटो पुन्हा ट्विट करत यात आक्षेपार्ह काय आहे असा प्रश्न उपस्थित केला. स्मृती इराणी पीटीआयच्या कामात हस्तक्षेप का करत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पीटीआयने याआधीही स्मृती इराणींची माफी मागितली होती. मुसळधार पावसाने अहमदाबादचं सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्यात बुडाल्याचं आणि विमाने पाण्यावर तरंगत असल्याची ओळ देऊन ‘पीटीआय’ने अहमदाबाद विमानतळाचे फोटो प्रसिद्ध केले होते. विश्वासार्ह पण ते फोटो अहमदाबादमधील नसून २०१५ मधील चेन्नई विमानतळाची असल्याचं नंतर समोर आलं होतं. स्मृती इराणींनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर पीटीआयला माफी मागावी लागली होती. या प्रकरणावरून पीटीआयच्या एका फोटोग्राफरला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं.