नवी दिल्ली- आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाच्या मागणीसाठी तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे नवी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणास बसले आहेत. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्यांच्या हातातच जनतेनं देश सोपवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना चाय वाला म्हटलं जाते. एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाल्यानं अनेकांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला होता.आता पोस्टरच्या माध्यमातूनही मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी या प्रकरणात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओही जारी करण्यात आला आहे. मालवीयनं लिहिलं आहे की, विरोधी पक्ष मोदींच्या भूतकाळातील गोष्टींवर नेहमीच त्यांना टार्गेट करतात. मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती-जमातीचा असणं हा अभिशाप आहे काय ?, असा प्रश्नही मालवीय यांनी उपस्थित केला आहे.
"ज्याला चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्याला जनतेनं पंतप्रधान बनवलं"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 16:10 IST