शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींनाच चक्रव्यूहात अडकवले; काँग्रेसच्या चक्रव्यूहातले 7 पात्र सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 19:01 IST

Anurag Thakur Speech : भाजप नेते अनुराग ठाकुर यांनी लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावर जोरदार पलटवार केला.

Parliament Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहाला मिळत आहे. आजही लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. ठाकूर यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना राहुल गांधींच्या भाषणावरही हल्लाबोल केला. त्यांनी राहुल गांधींच्या 'महाभारत, अभिमन्यू आणि चक्रव्यूह' या मुद्द्याचा संदर्भ देत नवी पात्रांची ओळख करुन दिली. 

अनुराग ठाकूर यांनी मला शिविगाळ केली, राहुल गांधींचा गंभीर आरोप, लोकसभेत खडाजंगी  

अनुराग ठाकूर म्हणतात, 'अभिमन्यूची हत्या सहा नाही, तर सात महारथींनी केली होती. काही लोक अपघाती हिंदू आहेत आणि महाभारताचे त्यांचे ज्ञानही अपघाती आहे. अभिमन्यूला जयद्रथ, दुर्योधन, दुशासन, कर्ण, कप्रिचार्य, शकुनी आणि द्रोणाचार्य, या सात योद्ध्यांनी मारले होते. हे त्या नेत्याशिवाय इतर सर्वांना माहीत आहे. राहुल गांधींनी महाभारत वाचले किंवा पाहिले आहे की नाही, हे कुणालाही माहीत नाही.

चक्रव्यूहचे नवे NG, IG, RG1, SG आणि RG2...यावेळी अनुराग ठाकूर यांनी अभिमन्यूची हत्या करणाऱ्या सात पात्रांचा संबंध काँग्रेस पक्षाच्या सात पात्रांशी जोडला आणि त्यांचे वर्णन सात चक्रव्यूह असे केले. ते म्हणाले की, 'चक्रव्यूहाचे पहिले पात्र काँग्रेस, दुसरे देशाचे पहिले पंतप्रधान - एनजी, तिसरे पात्र देशाच्या माजी पंतप्रधान आयजी, चौथे पात्र माजी पंतप्रधान आरजी 1, पाचवे पात्र एसजी, सहावे पात्र आरजी 2 आणि सातवे तुम्हा सर्वांना माहित आहे,' असे म्हणत ठाकूर यांचा निशाणा गांधी परिवारावर होता.

सहा लोकांनी चक्रव्यूह निर्माण केले अन् देशाला त्यात अभिमन्यूसारखे अडकवले: राहुल गांधी 

ते पुढे म्हणाले की, 'पहिल्या चक्रव्यूहमुळे देशाची फाळणी झाली. दुसऱ्या चक्रव्यूहामुळे काश्मीरची समस्या निर्माण झाली आणि चीनच्या ताब्यात भारताची जमीन गेली. तिसऱ्या चक्रव्यूहाने देशात आणीबाणी आणि पंजाबमध्ये अशांतता आणली. चौथ्या चक्रव्यूहाने बोफोर्स आणि शिखांची कत्तल केली. पाचव्या चक्रव्यूहाने सनातन धर्माविषयी द्वेष पसरवला, 12 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्यांना संरक्षण दिले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला भोवऱ्यात अडकवले. सहाव्या चक्रव्यूहांने देशाचे राजकारण, संसदीय परंपरा आणि संस्कृतीचे जास्त नुकसान झाले. सातव्या चक्रव्यूहाचे नाव मी घेणार नाही. या सात चक्रव्यूहांनी देशाला उपासमार, गरिबी, दहशतवाद, कट्टरता यांसारख्या अगणित दुष्टचक्रात अडकवले. या सर्व गोष्टींची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मुक्तता झाली, ' अशी घणाघाती टीका अनुराग ठाकूर यांनी यावेळी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAnurag Thakurअनुराग ठाकुरParliamentसंसदUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019