शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींनाच चक्रव्यूहात अडकवले; काँग्रेसच्या चक्रव्यूहातले 7 पात्र सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 19:01 IST

Anurag Thakur Speech : भाजप नेते अनुराग ठाकुर यांनी लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावर जोरदार पलटवार केला.

Parliament Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहाला मिळत आहे. आजही लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. ठाकूर यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना राहुल गांधींच्या भाषणावरही हल्लाबोल केला. त्यांनी राहुल गांधींच्या 'महाभारत, अभिमन्यू आणि चक्रव्यूह' या मुद्द्याचा संदर्भ देत नवी पात्रांची ओळख करुन दिली. 

अनुराग ठाकूर यांनी मला शिविगाळ केली, राहुल गांधींचा गंभीर आरोप, लोकसभेत खडाजंगी  

अनुराग ठाकूर म्हणतात, 'अभिमन्यूची हत्या सहा नाही, तर सात महारथींनी केली होती. काही लोक अपघाती हिंदू आहेत आणि महाभारताचे त्यांचे ज्ञानही अपघाती आहे. अभिमन्यूला जयद्रथ, दुर्योधन, दुशासन, कर्ण, कप्रिचार्य, शकुनी आणि द्रोणाचार्य, या सात योद्ध्यांनी मारले होते. हे त्या नेत्याशिवाय इतर सर्वांना माहीत आहे. राहुल गांधींनी महाभारत वाचले किंवा पाहिले आहे की नाही, हे कुणालाही माहीत नाही.

चक्रव्यूहचे नवे NG, IG, RG1, SG आणि RG2...यावेळी अनुराग ठाकूर यांनी अभिमन्यूची हत्या करणाऱ्या सात पात्रांचा संबंध काँग्रेस पक्षाच्या सात पात्रांशी जोडला आणि त्यांचे वर्णन सात चक्रव्यूह असे केले. ते म्हणाले की, 'चक्रव्यूहाचे पहिले पात्र काँग्रेस, दुसरे देशाचे पहिले पंतप्रधान - एनजी, तिसरे पात्र देशाच्या माजी पंतप्रधान आयजी, चौथे पात्र माजी पंतप्रधान आरजी 1, पाचवे पात्र एसजी, सहावे पात्र आरजी 2 आणि सातवे तुम्हा सर्वांना माहित आहे,' असे म्हणत ठाकूर यांचा निशाणा गांधी परिवारावर होता.

सहा लोकांनी चक्रव्यूह निर्माण केले अन् देशाला त्यात अभिमन्यूसारखे अडकवले: राहुल गांधी 

ते पुढे म्हणाले की, 'पहिल्या चक्रव्यूहमुळे देशाची फाळणी झाली. दुसऱ्या चक्रव्यूहामुळे काश्मीरची समस्या निर्माण झाली आणि चीनच्या ताब्यात भारताची जमीन गेली. तिसऱ्या चक्रव्यूहाने देशात आणीबाणी आणि पंजाबमध्ये अशांतता आणली. चौथ्या चक्रव्यूहाने बोफोर्स आणि शिखांची कत्तल केली. पाचव्या चक्रव्यूहाने सनातन धर्माविषयी द्वेष पसरवला, 12 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्यांना संरक्षण दिले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला भोवऱ्यात अडकवले. सहाव्या चक्रव्यूहांने देशाचे राजकारण, संसदीय परंपरा आणि संस्कृतीचे जास्त नुकसान झाले. सातव्या चक्रव्यूहाचे नाव मी घेणार नाही. या सात चक्रव्यूहांनी देशाला उपासमार, गरिबी, दहशतवाद, कट्टरता यांसारख्या अगणित दुष्टचक्रात अडकवले. या सर्व गोष्टींची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मुक्तता झाली, ' अशी घणाघाती टीका अनुराग ठाकूर यांनी यावेळी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAnurag Thakurअनुराग ठाकुरParliamentसंसदUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019