शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

‘देशविरोधी कृत्ये’, १२ सरकारी कर्मचारी काश्मिरात बडतर्फ

By admin | Updated: October 21, 2016 03:08 IST

देशविरोधी कारवाया केल्याबद्दल जम्मू आणि काश्मीर सरकारने आपल्या १२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले कर्मचारी महसूल, सार्वजनिक आरोग्य

- सुरेश डुग्गर, श्रीनगर

देशविरोधी कारवाया केल्याबद्दल जम्मू आणि काश्मीर सरकारने आपल्या १२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले कर्मचारी महसूल, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, ग्रामविकास, शिक्षण आदी विभागांतील आहेत. राज्य सरकारने त्यांना बडतर्फ करण्यासाठी जम्मू-काश्मीर घटनेच्या कलम १२६ चा आधार घेतला. यापैकी काही कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यातहत अटक करण्यात आली होती, तर उर्वरित जामिनावर आहेत किंवा अटक टाळत आहेत.राज्य पोलीस दलाच्या गुप्तवार्ता विभागाने वातावरण भडकावणे तसेच युवकांना हिंसाचारास चिथावल्याबद्दल ३६ सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध गेल्या महिन्यात अहवाल तयार केला होता. हा अहवाल पुढील कारवाईसाठी मुख्य सचिवांच्या कार्यालयात पाठविल्यानंतर बडतर्फीचे आदेश निघाले. आणखी काही कर्मचाऱ्यांची या अहवालाच्या आधारे चौकशी सुरू असून, त्यानंतर अन्य काही कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरकारी कर्मचारी देशविरोधी कारवायांत गुंतल्याचे यापूर्वीही आढळले असून, त्यातील काहींना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. यापूर्वी १९९० मध्ये ५ जणांना राज्य सरकारने सेवेतून बडतर्फ केले होते. विद्यमान शिक्षणमंत्री नईम अख्तर यांचा त्यात समावेश होता.काश्मिरात शांतता, वाहने मोठ्या संख्येने रस्त्यावरकाश्मीर खोऱ्यात प्रमुख रस्त्यांवरील वाहनांचे ये-जा वाढली असून, शहरातील सिव्हिल लाईन्स भागातील परिस्थिती सामान्य होत आहे. तथापि, खोऱ्यात फुटीरवाद्यांच्या बंदमुळे सलग १०४ व्या दिवशीही जनजीवन सुरळीत होऊ शकले नाही. फुटीरवाद्यांनी बंदची मुदत २७ आॅक्टोबरपर्यंत वाढविली आहे. फुटीरवाद्यांच्या बंदचा आज १०४ वा दिवस आहे. मात्र, परिस्थिती सामान्य होत असल्याचे दिसून आले. खासगी कार, आॅटोरिक्षा आणि टॅक्सी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत. आता अधिकाधिक लोक फुटीरवाद्यांच्या बंदला महत्त्व न देता आपले दैनंदिन काम करीत आहेत. अनेक ठिकाणी दुकानेही उघडू लागली असून, वाहतुकीची कोंडीही पाहावयास मिळत आहे. संपूर्ण काश्मीर खोऱ्यात कुठेही संचारबंदी नसून संवेदनशील ठिकाणी मोठ्या संख्येने सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.