शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आकडेवारीला आकडेवारीनेच उत्तर द्या! काँग्रेसचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 05:48 IST

मोदी सरकारने ४ वर्षांत जनतेचा कसा विश्वासघात केला आहे, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही विविध शासकीय संस्थांची आकडेवारी आहोत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आमचे म्हणणे खोडून काढण्यासाठी हिंमत असेल तर आकडेवारीला आकडेवारीनेच उत्तर द्यावे.

मुंबई - मोदी सरकारने ४ वर्षांत जनतेचा कसा विश्वासघात केला आहे, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही विविध शासकीय संस्थांची आकडेवारी आहोत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आमचे म्हणणे खोडून काढण्यासाठी हिंमत असेल तर आकडेवारीला आकडेवारीनेच उत्तर द्यावे. लोक काही घास खात नाहीत हे लक्षात ठेवावे, अशा कठोर शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी भाजपावर हल्लाबोल केला.देशातले कोणतेही क्षेत्र आज सुरक्षित राहिलेले नाही. धमक्या, पैशांचे आमिष नाहीतर कायद्याच्या कचाट्यात अडकवणे, असे सुडाचे राजकारण भाजपाने सुरू केले आहे. काँग्रेसमुक्त भारत घोषणा करताना मात्र त्यांना निवडून येण्यासाठी आमच्या सारख्या पक्षातलेच लोक लागत आहेत, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. कल्पनेच्या पलिकडे भाजपाने जनतेचा विश्वासघात केला आहे. आम्ही सरकारच्या कामाचे मूल्यमापन त्यांनी दिलेल्या आकडेवारीच्याच आधारे केले आहे, असे सांगत सिंघवी यांनी ‘विश्वासघाताची ४ वर्षे’ ही पुस्तिकाच सादर केली. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, मुख्य प्रवक्ते सचिन सावंत आदींची उपस्थिती होती.पीक विमा योजनेत कंपन्यांचे झाले सोने!पंतप्रधान पीक विमा योजनेत २०१६-१७ मध्ये शासनाने २०,४७८ कोटी रुपये विमा कंपन्यांना हप्ता म्हणून दिले.कंपन्यांनी फक्त ५,६५० कोटी रुपये पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना दिले आणि १४,८२८ कोटी रुपये विमा कंपन्यांनी लाटले!काँग्रेसने ‘आरबीआय’च्या अहवालाचाहवाला देत दिलेली आकडेवारी अशी...च्२००४ ते २०१४ या काळात ४.२ टक्के असलेला कृषी विकास दर २०१४-१८ मध्ये १.९ टक्के झाला.च्आघाडी सरकारच्या काळातील मनरेगाच्या कामाचे दिवस ४५ दिवस आता केवळ १६.३ झाले आहेत.च्पंतप्रधानांनी किमान हमीभाव देण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले. नंतर चारच महिन्यांनी सर्वाेच्च न्यायालयात असा हमीभाव देता येणार नाही, असे शपथपत्र दिले. आता वित्तमंत्री हमीभाव दिल्याचे सांगत आहेत. एकाही पिकाला खर्च अधिक ५० टक्के नफा, असा भाव मोदी सरकारने दिलेला नाही.च्महाराष्टÑात ८९ लाख शेतकºयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. प्रत्यक्षात ३० लाख शेतकºयांना कर्जमाफी नाकारली.च्भाजपाची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात ११,७०० शेतकºयांना फक्त १ रुपया ते ५०० रुपये अशी कर्जमाफी दिली.चार वर्षांत ५० हजारशेतकरी आत्महत्या२०१४-१५ १२,३६०२०१५-१६ १२,६०२२०१६-१७ ११,४५८२०१७-१८ १४,०००एकूण ५०,४२०नोकºया देण्याचे खोटे आश्वासनच्पंतप्रधानांंनी दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात २०१६-१७ मध्ये फक्त ४.१६ लाख नोकºया दिल्या. (लेबर ब्युरोचा अहवाल)च्फेब्रुवारी २०१८ मध्ये भारतात ३.१० कोटी तरुण बेरोजगार होते. (सीएमआयई)च्२०१९ पर्यंत ७७ टक्के भारतीय श्रमिक नोकºयांसाठी वणवण भटकतील. (आईएलओ)च्नोटबंदीमुळे १५ लाख नोकºया संपुष्टात आल्या. (सीएमआईई)च्एचवन बी व्हिसाची मुदत संपताच ७.५ लाख भारतीय परत येतील.च्आयटी क्षेत्रात ५० हजार तर टेलिकॉममध्ये ९० हजार नोकºया गेल्या.एकूण भारतीय आयटी कर्मचारी : ३९ लाखदोन वर्षांत अपेक्षित नोकरकपात : १७ लाख ५२ हजाररिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार -२००८च्या चौथ्या तिमाहीत बँकांना४४,५४२कोटींचा तोटा अपेक्षित१ लाख कोटीरुपयांच्या फसवणुकीची२३ हजारप्रकरणे समोर आली.११बँक घोटाळ्यांत६१,०३६कोटींचा फटका

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार