शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

बाबो! आई प्रियंका चोप्रा तर वडिलांचं नाव सनी देओल; 12 वीची उत्तरपत्रिका पाहून शिक्षक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 19:53 IST

12th exam shocking viral photo : विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिलेलं उत्तर पाहून शिक्षकांनी थेट डोक्यालाच हात लावला आहे. सध्या याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

नवी दिल्ली - प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अभ्यास, परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते. पण कित्येकदा अभ्यास न झाल्याने परीक्षेत कॉपी केली जाते किंवा मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर काहीही लिहिलं जातं. काही विद्यार्थी उत्तर लिहिण्याऐवजी चित्रपटातील गाणी अथवा डायलॉग लिहितात. तर काही जण वाटेल ते लिहितात. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिलेलं उत्तर पाहून शिक्षकांनी थेट डोक्यालाच हात लावला आहे. सध्या याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका उत्तरपत्रिकेचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये विद्यार्थ्याने लिहिलेलं उत्तर पाहून तुम्हालाही धक्काच बसेल. शिक्षक कोमात आणि विद्यार्थी जोमात असंच म्हणावं लागेल. बिहारच्या बेतियामध्ये राम लखन सिंह यादव कॉलेजमध्ये सुरू असलेल्या 12 वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी अजबच उत्तर लिहिल्याचा प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थ्याने तर उत्तर पत्रिकेत आपल्या आईच्या नावाच्या जागी प्रियंका चोप्राचं नाव लिहिलं आहे. तर वडिलांचं नाव सनी देओल लिहिलं आहे. 

दुसऱ्या एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत प्रेमात 'बेवफा' झाल्याबद्दल लिहिलं आहे. राम लखन सिंह यादव महाविद्यालयाच्या उत्तर पत्रिकेवर अभिनेता, अभिनेत्रींची नावे पाहिल्यावर तर अनेकांना धक्काच बसला. त्यावर रोल नंबर नाही आणि प्रश्नांच्या उत्तरांच्या रखाण्यात काहीही विचित्र गोष्टी लिहिल्या आहेत. व्हायरल कॉपीमध्ये विद्यार्थ्याचं नाव आदित्य कुमार, रोल नं-170, वर्ग- 12 लिहिण्याबरोबरच एका तरुणीचं नाव लिहिण्याबरोबरच आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. व्हायरल होत असलेल्या उत्तर पत्रिकेत पुरातत्वबदद्ल प्रश्न विचारला होता, त्याखाली विद्यार्थ्यांनी लिहिलं की, आम्हाला शिक्षकांनी त्याबद्दल शिकवलं नाही. 

विद्यार्थ्याने मोहनजोदडोच्या विशाल स्नानागारच्या वर्णनाबद्दल लिहिलं आहे की, राजाची पत्नी तेथे नाचत असे आणि कपडे चोरी करीत होत्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी भाखडा नागल डॅमबाबत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. विद्यार्थ्याने आपल्या उत्तरामध्ये धरण सतलज नदीवर बांधलं आहे. पुढे तो सरदार पटेल, टाटा-बाय बाय, पंडित जवाहरलाल नेहरू, गुलाबाची शेती, चीन, लंडन, जर्मनी आणि विश्वयुद्धापर्यंत पोहोचतो आणि शेवटी फिरून तो विद्यार्थी पुन्हा पंजाब, सतलज नदी आणि धरणावर पोहोचतो. या उत्तरपत्रिकेवर दहापैकी शून्य गुण देण्यात आले होते.  

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी