शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

आणखी एका न्यायाधीशाचा बळी: राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:44 IST

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्यात अपिलांची सुनावणी घेत असलेल्या न्यायमूर्तींकडील काम काढण्यामागे सरकारचा दुष्ट हेतू...

नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्यात अपिलांची सुनावणी घेत असलेल्या न्यायमूर्तींकडील काम काढण्यामागे सरकारचा दुष्ट हेतू असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केला आहे.या चकमक खटल्यात अपिलांची सुनावणी करीत असलेल्या न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्याकडे शनिवारी अटकपूर्व जामीन व जामीन अर्जांच्या सुनावणीचे काम दिले गेले. डेरे यांच्या कामात केलेला बदल नेहमीच्या कामाचा भाग असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरद्वारे हा बदल हेतूत: केल्याचे म्हटले. गांधी म्हणाले की, सोहराबुद्दीन प्रकरणाने आणखी एका न्यायाधीशाचा बळी घेतला आहे. केंद्रीय गुप्तचर खात्याला आव्हान दिलेल्या रेवती डेरे यांना तेथून हलविण्यात आले आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांना न्यायालयात हजर राहा, असे सांगणारे न्या. जे. टी. उत्पात यांना हलविण्यात आले. न्या. लोया यांचाही संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. सुनावणी दरम्यान रेवती मोहिते-डेरे यांनी न्यायालयाला सीबीआयकडून पुरेसे साह्य मिळत नसल्याचे वारंवार म्हटले होते. गांधी यांच्या आरोपाला हा संदर्भ होता.न्या. उत्पात यांनाही केले होते दूर-त्या आधी न्या. उत्पात यांनी भाजपाचे तत्कालीन सरचिटणीस अमित शाह समन्स बजावूनही, न्यायालयात हजर राहत नसल्याबद्दल त्यांना खडसावल्यानंतर त्यांना काहीच दिवसांत जून २०१४ मध्ये या खटल्यातून दूर करण्यात आले होते. उत्पात यांच्या जागी न्या. बी. एच. लोया यांची नियुक्ती केली गेली. डिसेंबर २०१४ मध्ये लोया यांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला. त्यानंतर, शाह या खटल्यात निर्दोष जाहीर झाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाहSohrabuddin Sheikh encounter caseसोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणCBI judge B.H Loya death caseन्या. लोया मृत्यू प्रकरण