शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अरविंद केजरीवाल यांना आणखी एक दिलासा, उच्च न्यायालयानं पूर्ण केली मोठी मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 19:06 IST

केजरीवाल यांना 21 मार्चरोजी मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांना ईडी केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मात्र, आता ते सीबीआय केसमुळे कारागृहात आहेत.

कथित मद्य घोटाळाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. वकिलांसोबतच्या बैठकांची संख्या वाढविण्यासंदर्भातील त्यांची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. न्यायालयाच्या मंजूरीनंतर, आता ते कारागृहातून आपल्या वकीलांसोबत दर आठवड्याला दोन अधिकच्या बैठका करू शकतील.

केजरीवाल यांना 21 मार्चरोजी मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांना ईडी केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मात्र, आता ते सीबीआय केसमुळे कारागृहात आहेत.

यासंदर्भात जस्टिस नीना बंसल कृष्णा म्हणाले, 'विशेष परिस्थितीत विशेष उपायांची आवश्यकता असते. निष्पक्ष ट्रायलचा मुलभूत अधिकार आणि प्रभावी कायदेशीर प्रतिनिधित्वाला मान्यता देत, याचिकाकर्त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वकिलांशी दोन अतिरिक्त बैठकांची परवानगी देण्यात येत आहे. तसेच, केजरीवाल जोवर कारागृहात असतील, तोवर त्यांना ही सुविधा मिळत राहील. तत्पूर्वी, उच्च न्यायालयाने 18 जुलैरोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करत निर्णय राखून ठेवला होता. 

यासंदर्भात, कायदा सर्वांसाठी समान असल्याचे म्हणत,  अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांच्या मागणीला विरोध केला होता. तसेच, आम आदमी पक्षाचे प्रमुख सध्या देशभरात सुमारे 35 खटल्यांचा सामना करत आहेत. यामुळे, या प्रकरणांवरील निष्पक्ष सुनावणीसाठी त्यांना वकिलांसोबत चर्चेकरिता दोन अतिरिक्त व्हिडिओ कॉन्फरन्सची आवश्यकता आहे, असे केजरीवाल यांच्या वकिलाने म्हटले होते.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालCourtन्यायालयjailतुरुंग