शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

बहुविवाह, हलालाची वैधताही तपासणार, आणखी एक प्रथा रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 03:32 IST

बहुविवाह आणि निकाह हलाला या वादग्रस्त प्रथांचीही घटनात्मक वैधता तपासून पाहण्याचे ठरविले आहे

नवी दिल्ली: सात महिन्यांपूर्वी ‘तिहेरी तलाक’ घटनाबाह्य ठरविणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम समाजामधील बहुविवाह आणि निकाह हलाला या वादग्रस्त प्रथांचीही घटनात्मक वैधता तपासून पाहण्याचे ठरविले आहे. यासाठी पाच न्यायाधीशांचे विशेष घटनापीठ स्थापन केले जाणार आहे.बहुविवाह, निकाह हलाला, निकाह मुताह व निकाह मिस्यार या प्रथांच्या वैधतेस आव्हान देणाºया जनहित याचिकेसह चार रिट याचिका सोमवारी सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे आल्या, तेव्हा याचिकाकर्त्यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने केंद्राच्या महिला व बालकल्याण, विधी व न्याय तसेच अल्पसंख्य व्यवहार मंत्रालयांना नोटिसा काढण्याचे निर्देश दिले. विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन विशेष घटनापीठाची विनंतीही मान्य केली. याचिकांत केंद्रीय विधी आयोगासही प्रतिवादी केले होते. मात्र त्याची गरज नाही, असे खंडपीठाने म्हटले.नवी दिल्लीतील समीना बेगम, अश्विनी कुमार उपाध्याय व नफिसा खान तसेच हैदराबादच्या मौलिम मोहसीन बिन हुसैन बिन अब्बाद अल खत्री यांनी यांच्या या याचिका आहेत. ‘मुस्लीम विमेन रेसिस्टन्स कमिटी’ला पक्षकार होण्यासाठी अर्ज करण्याचीही मुभा देण्यात आली.गोपाळ शंकरानारायणन मोहन पराशरन, व्ही. शंकर, साजन पूवय्या व या वकिलांनी या प्रथा घटनाबाह्य का ठरवाव्यात, याचे विवेचन केले. घटनापीठाने तिहेरी तलाकचा निकाल देताना हे मुद्दे जाणीवपूर्वक बाजूला ठेवले, हेही त्यांनी निदर्शनास आणले.काय आहेत या प्रथा?बहुविवाह : यात मुस्लीम पुरुषावर एकपत्नीत्वाचे बंधन नाही. त्यालाचार स्त्रियांशी विवाह करण्याची मुभा आहे.निकाह हलाला : आधी तलाक झालेल्या मुस्लीम स्त्री-पुरुषाला पुन्हा एकमेकांशी विवाह करण्यासाठी ही पद्धत आहे. अशा परिस्थितीत तलाकशुदा स्त्रीला दुसºया एखाद्या पुरुषाशी विवाह करून शरीरसंबंध ठेवावा लागतो. नंतर त्या पुरुषापासून तलाक घेतल्यावरच स्त्री आधी तलाक घेतलेल्या पुरुषाशी विवाह करू शकते. दरम्यानच्या काळातील हा कंत्राटी विवाह असतो. हे बंधन मुस्लीम स्त्रीलाच आहे. पुरुषाला ते नाही.याचिकांमधील प्रमुख मुद्देबहुविवाह व निकाह हलालामुळे मुस्लीम महिलांच्या कायद्याकडून समान वागणूक मिळण्याच्या, लैंगिक समानतेच्या व प्रतिष्ठेचे जीवन जगण्याच्या घटनादत्त मुलभूत हक्कांची पायमल्ली होते. भारतीय दंड विधानाच्या कलम ४९४ नुसार पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह गुन्हा आहे. परंतु बहुविवाह प्रथेने मुस्लीम समाजासाठी ही फौजदारी तरतूद निरर्थक ठरते. पतीने दुसरा विवाह केला तरी पत्नी तक्रार करू शकत नाही. धर्माच्या आधारे मुस्लीम महिलांबाबत हा भेदभाव आहे. प्रथा मानवी हक्क व लैंगिक समानतेच्या संकल्पनांशी विसंगत आहेत.प्रथा कित्येकशतके रुढ असल्या तरी तो इस्लामी धर्माचरणाचा अविभाज्य भाग नाही. त्यामुळे त्या धार्मिक स्वातंत्र्यांच्या कक्षेत येत नाहीत.