शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

आणखी एक हिरे व्यापारी बँकांना बुडवून पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 06:49 IST

नीरव मोदी, मेहुल चोकसी, द्वारकादास सेठ यांच्या घोटाळ्यानंतर आता यात आणखी नवीन नाव जोडले गेले आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : नीरव मोदी, मेहुल चोकसी, द्वारकादास सेठ यांच्या घोटाळ्यानंतर आता यात आणखी नवीन नाव जोडले गेले आहे. हे नाव आहे प्रख्यात हिरे व्यापारी जतीन मेहता यांचे. जतीन मेहता यांच्यावरही बँकांची फसवणूक करून ६,७१२ कोटींचा कथित घोटाळा केल्याचा आरोप आहे. काँग्रेसने केंद्र सरकारकडे याबाबतचा खुलासा मागितला आहे.काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहिल आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांनी या कथित घोटाळ्यासंबंधी कागदपत्रे जनतेसमोर ठेवली आहेत. यात त्यांनी म्हटले आहे की, फेब्रुवारी २०१४ मध्ये मुंबईतील सीबीआय कार्यालय आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे जतीन मेहता यांच्या विनसम कंपनीविरोधात तक्रार करण्यात आली होती. यात बँकांची मोठी फसवणूक केल्याचा आरोप करीत या संदर्भातील पुरावेही सादर केले होते. परंतु सीबीआय तसेच मोदी सरकारने यावर काहीही कारवाई केली नाही. पुढे साडे तीन वर्षे शांत बसल्यानंतर सीबीआयने ५ एप्रिल २०१७ कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ४ एप्रिल २०१७ रोजी तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने ही तत्परता दाखविली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या काळात मोदी सरकार शांत बसले होते, तपास यंत्रणाही डोळे बंद करून बसल्या होत्या, तिकडे जतीन मेहता आणि त्याची पत्नी सहजपणे भारतातून पळून गेले, इतकेच काय त्यांनी भारताचे नागरिकत्वही सोडून दिले.हाती आलेल्या माहितीनुसार जतीन मेहता आणि त्याची पत्नी सध्या टॅक्सचोरीसाठी नंदनवन मानले जाणाºया सेंट किट्समध्ये रहात आहेत. त्यांनी हा देश निवडला कारण भारताने सेंट किट्ससोबत प्रत्यार्पण करार केलेला नाही.नीरव मोदी, मेहुल चोकसी यांच्याप्रमाणे जतीन मेहताही बँकांची फसवणूक करून भारतातून पळून गेला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत पंतप्रधानांनी बाळगलेल्या मौनाबद्दल काँग्रेसने टीका केली आहे. ‘चौकीदार झोपला आहे का, त्याचा आवाज का निघत नाही, तो शांत का बसला आहे’, असा जाब काँग्रेसने विचारला आहे.

काँग्रेसचे मोदींना प्रश्नसीबीआयने तात्काळ गुन्हा का दाखल केला नाही?साडेतीन वर्षांनंतर गुन्हा का दाखल केला?ईडी, ईओडब्ल्यू आणि मंत्रालयाने साडेतीन वर्षे कारवाई का नाही केली?हे सगळे शांत बसण्यामागचे रहस्य काय?

टॅग्स :congressकाँग्रेस