शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

आणखी एक हिरे व्यापारी बँकांना बुडवून पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 06:49 IST

नीरव मोदी, मेहुल चोकसी, द्वारकादास सेठ यांच्या घोटाळ्यानंतर आता यात आणखी नवीन नाव जोडले गेले आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : नीरव मोदी, मेहुल चोकसी, द्वारकादास सेठ यांच्या घोटाळ्यानंतर आता यात आणखी नवीन नाव जोडले गेले आहे. हे नाव आहे प्रख्यात हिरे व्यापारी जतीन मेहता यांचे. जतीन मेहता यांच्यावरही बँकांची फसवणूक करून ६,७१२ कोटींचा कथित घोटाळा केल्याचा आरोप आहे. काँग्रेसने केंद्र सरकारकडे याबाबतचा खुलासा मागितला आहे.काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहिल आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांनी या कथित घोटाळ्यासंबंधी कागदपत्रे जनतेसमोर ठेवली आहेत. यात त्यांनी म्हटले आहे की, फेब्रुवारी २०१४ मध्ये मुंबईतील सीबीआय कार्यालय आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे जतीन मेहता यांच्या विनसम कंपनीविरोधात तक्रार करण्यात आली होती. यात बँकांची मोठी फसवणूक केल्याचा आरोप करीत या संदर्भातील पुरावेही सादर केले होते. परंतु सीबीआय तसेच मोदी सरकारने यावर काहीही कारवाई केली नाही. पुढे साडे तीन वर्षे शांत बसल्यानंतर सीबीआयने ५ एप्रिल २०१७ कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ४ एप्रिल २०१७ रोजी तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने ही तत्परता दाखविली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या काळात मोदी सरकार शांत बसले होते, तपास यंत्रणाही डोळे बंद करून बसल्या होत्या, तिकडे जतीन मेहता आणि त्याची पत्नी सहजपणे भारतातून पळून गेले, इतकेच काय त्यांनी भारताचे नागरिकत्वही सोडून दिले.हाती आलेल्या माहितीनुसार जतीन मेहता आणि त्याची पत्नी सध्या टॅक्सचोरीसाठी नंदनवन मानले जाणाºया सेंट किट्समध्ये रहात आहेत. त्यांनी हा देश निवडला कारण भारताने सेंट किट्ससोबत प्रत्यार्पण करार केलेला नाही.नीरव मोदी, मेहुल चोकसी यांच्याप्रमाणे जतीन मेहताही बँकांची फसवणूक करून भारतातून पळून गेला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत पंतप्रधानांनी बाळगलेल्या मौनाबद्दल काँग्रेसने टीका केली आहे. ‘चौकीदार झोपला आहे का, त्याचा आवाज का निघत नाही, तो शांत का बसला आहे’, असा जाब काँग्रेसने विचारला आहे.

काँग्रेसचे मोदींना प्रश्नसीबीआयने तात्काळ गुन्हा का दाखल केला नाही?साडेतीन वर्षांनंतर गुन्हा का दाखल केला?ईडी, ईओडब्ल्यू आणि मंत्रालयाने साडेतीन वर्षे कारवाई का नाही केली?हे सगळे शांत बसण्यामागचे रहस्य काय?

टॅग्स :congressकाँग्रेस