शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

असंच, आज अन्ना हजारेंची आठवण येतेय, ऑलिंपिक विजेत्या खेळाडूची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 20:04 IST

केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कृषी कायदा तयार केल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनांच्या वतीने शुक्रवारी कृषी विधेयकाला कडाडून विरोध करत आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देअखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या वतीने केंद्र शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या देसातील विविध राज्यांत हे आंदोलन करण्यात आले.

मुंबई - बिजिंग ऑलिंपिक स्पर्धेतील ब्रांझ पदकविजेता बॉक्सर आणि देशातील नामवंत खेळाडू असलेल्या विजेंदर सिंगने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अन्ना हजारेंना चिमटा काढला आहे. देशातील शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी देशभरात पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा दर्शवत, असंच, पण आज अन्ना हजारेंची आठवण येतेय, असे ट्विट विजेंदर सिंगने केले आहे. केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या तीन शेतकरी विधेयकांला विरोध करत पंजाबमधील शेतकऱ्यांनी आज भारत बंदची घोषणा केली होती. 

केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कृषी कायदा तयार केल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनांच्या वतीने शुक्रवारी कृषी विधेयकाला कडाडून विरोध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र शासनाच्या प्रतिकात्मक अध्यादेशासह पुतळ्याचे दहन  करून संताप व्यक्त केला.अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या वतीने केंद्र शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या देसातील विविध राज्यांत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात या भागातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते. पंजाब आणि हरियाणात मोठ्या प्रमाणात आंदोलनाची धग पाहायला मिळाली. येथील शेतकऱ्यांनी रेल्वेगाड्याही अडवल्या होत्या. 

मोदी सरकारने लागू केलेले शेतकरी विधेयक हे शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्याच हिताचे जास्त असल्याचे सांगत शेतकरी संघटनांकडून विरोध होत आहे. पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी या विधेयकाला विरोध करत आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामाही दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर हरियाणाचा रहिवासी असलेल्या आणि माजी ऑलिंपिकविजेता बॉक्सरने भ्रष्ट्राचार निर्मूलनासाठी मोठं आंदोलन उभारणाऱ्या अन्ना हजारेंची आठवण काढली आहे. असंच, आज अन्ना हजारेंची आठवण आली, असे विजेंदरने म्हटलंय.  

आय सपोर्ट भारत बंद, या हॅशटॅगने विजेंदर सिंगने ट्विटरवर पोस्ट केली आहे. विजेंदरची ही पोस्ट रिट्विट करत माजी केंद्रीय कायदामंत्री डॉ. अश्वानी कुमार यांनी त्याचं कौतुक केलंय. तसेच, शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. याबद्दलही विजेंदरने त्यांचे आभार मानले आहेत. 

दरम्यान, अन्ना हजारे यांनी 2011 साली दिल्लीतील रामलीला मैदानावर मोठे आंदोलन उभारले होते. देशातील भ्रष्टाचाराविरुद्ध अन्नांनी उभारलेल्या या आंदोलनाची इतिहासात नोंद झाली आहे. या आंदोलनातूनच दिल्लीत सत्ताक्रांती झाल्याचेही देशाने पाहिले आहे. त्यामुळे, आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्ना गप्प का? असा प्रश्न विजेंदरसह अनेकांना पडलाय. 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेVijender Singhविजेंदर सिंगFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपBharat Bandhभारत बंद