शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत या, आपविरोधात आंदोलन करू; भाजपच्या पत्राला अण्णा हजारेंकडून सणसणीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 08:09 IST

अण्णा हजारेंचा आंदोलनात सहभागी होण्यास स्पष्ट नकार; भाजपला कठोर शब्दांत सुनावलं

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाविरोधातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पक्षानं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना पत्र लिहिलं होतं. या पत्राला अण्णांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. आपच्या भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी, व्यासपीठावर उपस्थित राहण्यासाठी भाजपनं अण्णांना साद घातली होती. मात्र या आंदोलनात सहभागी होण्यास अण्णांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. सगळे पक्ष सारखेच असतात, असं उत्तर अण्णांनी भाजपला दिलं.मी कोणत्याही आंदोलनासाठी पुन्हा दिल्लीला येणार नाही, असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. 'भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांच्याकडून मला कोणतंही पत्र मिळालेलं नाही. मात्र माध्यमांमधून मला याबद्दल समजलं,' असं अण्णा म्हणाले. अण्णांनी अप्रत्यक्षपणे भाजप प्रदेशाध्यक्ष गुप्ता यांच्या सल्लागारांच्या विश्वासार्हतेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. २४ ऑगस्टला पाठवलं गेलेलं पत्र मला मिळालेलं नाही, असं ते म्हणाले. दिल्ली आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरदेखील अण्णांनी भाष्य केलं. यावेळी अण्णांनी स्वत:ला फकीर म्हटलं. 'सर्वाधिक तरुण सदस्य असण्याचा दावा करणारा पक्ष अण्णा हजारेसारख्या फकीर माणसाला आंदोलनासाठी का बोलावतो आहे? यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय?,' असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. केंद्रात तुमचं सरकार आहे. दिल्ली सरकारचे अनेक विषयदेखील केंद्राच्याच अखत्यारित येतात. सीबीआय आणि दिल्ली पोलिसांवरदेखील तुमचंच नियंत्रण आहे, याची आठवण अण्णांनी भाजपला करून दिली.भ्रष्टाचार संपवण्यासाठी केंद्र सरकारनं कोणती पावलं उचलली असा प्रश्न अण्णांनी विचारला आहे. 'दिल्ली सरकारनं भ्रष्टाचार केला असेल तर कठोर कारवाई का केली नाही? भ्रष्टाचार दूर होऊन लोकांना दिलासा मिळावा, असं मला वाटतं. मात्र सध्या राजकीय पक्ष सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत दिल्लीला येऊन आंदोलन करून काहीही होणार नाही. चित्र बदलणार नाही,' असं अण्णांनी म्हटलं आहे.अण्णा हजारेंनी कडक शब्दांत सुनावल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्तांनी प्रतिक्रिया दिली. 'भाजपनं कायम दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला आहे. त्याच हेतूनं आम्ही अण्णांना पत्र लिहिलं. भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनाला गती देण्याचा मानस व्यक्त केला,' असं गुप्ता म्हणाले. 'अण्णांनी २०११ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केलं. त्यातून पुढे आम आदमी पक्षाचा जन्म झाला. मात्र भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्मलेला पक्षच आता भ्रष्टाचारात आकंठ बुडाला आहे, अशी टीका गुप्ता यांनी केली.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेBJPभाजपाAam Admi partyआम आदमी पार्टीCorruptionभ्रष्टाचार