शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Anna Hazare Hunger Strike : अण्णांचे उपोषण सुटणार ? देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 11:42 IST

गेल्या सहा दिवसांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण आजच्या दिवशीही सुरुच आहे. मात्र, या आंदोलनावर आज दुपारपर्यंत सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे. अण्णांनी सकाळी कोअर कमिटीची बैठक बोलाविली होती. या बैठकीत पीएमओतून आलेल्या सुधारित मसुद्यावर चर्चा करण्यात आली.

नवी दिल्ली : गेल्या सहा दिवसांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण आजच्या दिवशीही सुरुच आहे. मात्र, या आंदोलनावर आज दुपारपर्यंत सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे. अण्णांनी सकाळी कोअर कमिटीची बैठक बोलाविली होती. या बैठकीत पीएमओतून आलेल्या सुधारित मसुद्यावर चर्चा करण्यात आली. तसेच, अण्णांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे अण्णा आज उपोषण सोडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचबरोबर, अण्णांनी उपोषण सोडण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह सुद्धा उपस्थित राहणार आहेत.  अण्णांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. त्यांचे वजन तब्बल साडे पाच किलोने घटले असून त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला. तसेच, अण्णांनी आज उपोषण सोडण्याची गरज आहे. तसे न केल्यास त्यांची प्रकृती आणखी खालावणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याचबरोबर, आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास 15 आंदोलकांची गेल्या काही दिवसांमध्ये प्रकृती ढासळली असून त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत. दरम्यान, आंदोलनस्थळी केवळ महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कागद घेऊन येतात. केंद्र सरकारकडून ठोस आश्वासने नाहीत. निव्वळ धूळफेक चालली आहे. मोदी सरकार शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हिताचे नाही. आता मोदी सरकारचीही घरी जाण्याची वेळ आली असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी केली होती.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNew Delhiनवी दिल्ली