शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

अण्णा पुन्हा रामलीलावर, दिल्लीत बेमुदत उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 4:53 AM

शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती व निष्पक्ष निवडणुका या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून ‘करेंगे या मरेंंगे’ या निर्धाराने सत्याग्रह सुरू केला. वयाच्या ८०व्या वर्षी हृदयविकाराने मरण्यापेक्षा समाजासाठी उपोषण करून मरावे, अशा शब्दांत त्यांनी निर्धार व्यक्त करताच, देशभरातून आलेल्या आंदोलकांनी टाळ्यांच्या गजराने त्यांना पाठिंबा दिला.

- विकास खाडे/विनोद गोळे

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती व निष्पक्ष निवडणुका या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून ‘करेंगे या मरेंंगे’ या निर्धाराने सत्याग्रह सुरू केला. वयाच्या ८०व्या वर्षी हृदयविकाराने मरण्यापेक्षा समाजासाठी उपोषण करून मरावे, अशा शब्दांत त्यांनी निर्धार व्यक्त करताच, देशभरातून आलेल्या आंदोलकांनी टाळ्यांच्या गजराने त्यांना पाठिंबा दिला.राजघाटवर महात्मा गांधीजींच्या, तसेच शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या समाधीचे दर्शन घेऊ न अण्णा रामलीला मैदानावर आले. राजस्थानी शेतकºयांनी सादर केलेल्या क्रांतिगीतानंतर अण्णांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून येणा-या शेतकरी संघटनांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे त्यांनी स्वागत केले.अण्णा म्हणाले की, शेतक-यांना उत्पादन खर्चाप्रमाणे भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांच्या प्रश्नांबाबत मी ४३ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. मात्र, प्रश्न सुटत नाही. मी उपोषण करू नये, म्हणून मंत्री मला तीन-चार वेळा भेटून गेले. कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता दिली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनीही दिले. मात्र, शेतकरी प्रतिनिधींशी मी यावर चर्चा करेन, तुम्हीही त्यांच्यासमोर येऊन बोला, असे कृषिमंत्र्यांना सांगितले आहे. याबाबतचा निर्णय होईपर्यंत माझे उपोषण सुरूच राहील.कोणी मुख्यमंत्री तर कोणी मंत्री झालेत२0१२ मधील आंदोलनाच्या वेळी कर्नाटकचे माजी लोकायुक्त संतोष हेगडे हरयाणातील निवृत्त न्यायाधीश प्रीतमपाल अण्णांसोबत होते. आजही ते होते. त्यांचा उल्लेख करून अण्णा म्हणाले की, त्या आंदोलनाची टीम फुटली. कोणी मुख्यमंत्री, कोणी मंत्री झाले. सच्चे आंदोलक मात्र, आजही आमच्यासोबत आहेत. या आंदोलनातून कोणीही केजरीवाल, मंत्री, पक्ष तयार होणार नसून, शेतकºयांचे व समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी समिती आहे, असे अण्णांनी सांगितले.महाराष्ट्रासह देशभरातून मिळतोय पाठिंबाअण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पहिल्याच दिवशी देशभरात विविध ठिकाणी आंदोलनेही झाली. अनेक संघटनांनी अण्णांचा फोटो सोबत घेऊन आंदोलन केले. महाष्ट्रातही मोदी सरकारचा निषेध करत, अण्णासमर्थक काही काळ रस्त्यावर घोषणाबाजी करताना दिसले.अण्णांना अश्रू अनावरभगतसिंग, सुखदेव, राजगुरूया क्रांतिकारकांनी आजच्या दिनी स्वत:ची आहुती दिली. देशात लोकशाही नांदावी, असे या क्रांतिकारकांचे स्वप्न होते, पण कोठे आहे स्वातंत्र्य व लोकशाही? गांधीजींचे स्मरण करून हजारे म्हणाले की, शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. त्यासाठी स्वत:चा बळी द्यावा लागला, तरीचालेल. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता अण्णा हजारे महाराष्ट्र सदनमधून थेट राजघाटावर गेले. तेथे महात्मा गांधी यांच्या स्मृती स्थळाचे अण्णांनी दर्शन घेतले. या वेळी अण्णांना अश्रू अनावर झाले.सरकारने बसेस, रेल्वे रोखल्याया आंदोलनासाठी येणा-यांच्या बसगाड्या सरकाररोखत आहे. रेल्वेगाड्या रद्द करीत आहे. याला लोकशाही म्हणायचे का? तरीही लोक दिल्लीकडे येत आहेत. मी अधूनमधून बोलत राहीन. बोलण्यामुळे ऊर्जा कमी होत असली, तरी मला पर्वा नाही.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे