शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

"ती आमच्यासाठी मेली"; पाकिस्तानात जाऊन निकाह केलेल्या अंजूच्या वडिलांनी सांगितलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 15:12 IST

अंजूने तिचं नाव बदलून फातिमा ठेवलं. मुलीच्या या कृत्याने अंजूच्या वडिलांना दु:ख झालं आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर मैत्री केल्यानंतर भारतातून अंजू तिचा मित्र नसरुल्लाहला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली. अंजू कायदेशीररित्या व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेली होती, पण आता तिने तिथे धर्म बदलला आणि नसरुल्लाह या मित्राशी निकाह केला आहे. अंजूने तिचं नाव बदलून फातिमा ठेवलं. मुलीच्या या कृत्याने अंजूच्या वडिलांना दु:ख झालं आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

मध्य प्रदेशातील टेकनपूर येथे राहणारे अंजूचे वडील म्हणाले, "ती आमच्यासाठी आता मेली आहे. मला कोणत्याही गोष्टीची माहिती नाही. आता तिच्याशी माझं काही देणं-घेणं नाही, ती तिला हवं ते करू शकते." मुलीच्या पाकिस्तानात जाण्याच्या प्रश्नावर वडील म्हणाले की, तिचं काय चाललं होतं हे मला माहीत नाही कारण मी गेलं एक वर्ष तिच्याशी बोललो देखील नाही. 

जी मुलगी आपल्या मुलांना सोडून गेली, तिच्याशी आमचं नातं संपलं आहे. नवऱ्याला सोडा, जी स्वत:च्या मुलांना सोडून गेली त्या मुलीशी माझा संबंध कसा असू शकतो? असं म्हटलं आहे. दुसरीकडे, व्हिसाची मुदत संपल्यानंतर देशात परतण्याच्या प्रश्नावर अंजूच्या वडिलांनी सांगितले की, व्हिसाची मुदत संपली काय किंवा ती स्वतःच संपली काय आता याच्याशी माझा काहीही संबंध नाही. 

अंजूने दोन मुलांचंही आयुष्य उद्ध्वस्त केलंय. आता 14 वर्षांच्या मुलाची आणि 5 वर्षांच्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी कोण घेणार? असंही म्हटलं. पाक मीडियाच्या रिपोर्टनुसार, अंजूने तिचा धर्म बदलला आहे, त्यानंतर अंजूचे इस्लामिक नाव फातिमा ठेवण्यात आले आहे. प्रियकरासाठी अंजू भारतातून पाकिस्तानात गेली आणि त्यानंतर आता तिने निकाह केला आहे, सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान