शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

"ती आमच्यासाठी मेली"; पाकिस्तानात जाऊन निकाह केलेल्या अंजूच्या वडिलांनी सांगितलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 15:12 IST

अंजूने तिचं नाव बदलून फातिमा ठेवलं. मुलीच्या या कृत्याने अंजूच्या वडिलांना दु:ख झालं आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर मैत्री केल्यानंतर भारतातून अंजू तिचा मित्र नसरुल्लाहला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली. अंजू कायदेशीररित्या व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेली होती, पण आता तिने तिथे धर्म बदलला आणि नसरुल्लाह या मित्राशी निकाह केला आहे. अंजूने तिचं नाव बदलून फातिमा ठेवलं. मुलीच्या या कृत्याने अंजूच्या वडिलांना दु:ख झालं आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

मध्य प्रदेशातील टेकनपूर येथे राहणारे अंजूचे वडील म्हणाले, "ती आमच्यासाठी आता मेली आहे. मला कोणत्याही गोष्टीची माहिती नाही. आता तिच्याशी माझं काही देणं-घेणं नाही, ती तिला हवं ते करू शकते." मुलीच्या पाकिस्तानात जाण्याच्या प्रश्नावर वडील म्हणाले की, तिचं काय चाललं होतं हे मला माहीत नाही कारण मी गेलं एक वर्ष तिच्याशी बोललो देखील नाही. 

जी मुलगी आपल्या मुलांना सोडून गेली, तिच्याशी आमचं नातं संपलं आहे. नवऱ्याला सोडा, जी स्वत:च्या मुलांना सोडून गेली त्या मुलीशी माझा संबंध कसा असू शकतो? असं म्हटलं आहे. दुसरीकडे, व्हिसाची मुदत संपल्यानंतर देशात परतण्याच्या प्रश्नावर अंजूच्या वडिलांनी सांगितले की, व्हिसाची मुदत संपली काय किंवा ती स्वतःच संपली काय आता याच्याशी माझा काहीही संबंध नाही. 

अंजूने दोन मुलांचंही आयुष्य उद्ध्वस्त केलंय. आता 14 वर्षांच्या मुलाची आणि 5 वर्षांच्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी कोण घेणार? असंही म्हटलं. पाक मीडियाच्या रिपोर्टनुसार, अंजूने तिचा धर्म बदलला आहे, त्यानंतर अंजूचे इस्लामिक नाव फातिमा ठेवण्यात आले आहे. प्रियकरासाठी अंजू भारतातून पाकिस्तानात गेली आणि त्यानंतर आता तिने निकाह केला आहे, सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान