शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

Anita Bose: “माझे वडील जिवंत असते, तर देशाची फाळणी झाली नसती”; नेताजींच्या कन्येनं गांधीजींबाबतही मांडलं मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 11:10 IST

Anita Bose: नेताजी सुभाषचंद्र बोस जिवंत असते, तर देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते का, यावर कन्या अनिता बोस यांनी रोखठोक मत मांडले.

नवी दिल्ली:महात्मा गांधीची माझे वडील नेताजी सुभाषचंद्र बोस यांना राजकारणापासून दूर ठेऊ इच्छित होते. माझ्या वडिलांना देशाची फाळणी मान्य नव्हती. महात्मा गांधीजींशी असलेल्या मतभेदांनतरही नेताजींनी फाळणीचा विरोधच केला असता. माझे वडील जिवंत असते, तर देशाची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली नसती, असे परखड मत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी व्यक्त केले आहे. अनिता बोस सध्या जर्मनीत राहत असून, २३ जानेवारी रोजी इंडिया गेटवर नेताजींचा होलोग्राम पुतळा स्थापन केल्यावर अनिता बोस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

एका वृत्तपत्राशी संवाद साधताना अनिता बोस म्हणाल्या की, भारत सरकारने इंडिया गेटवर नेताजींची प्रतिमा स्थापन केली, याबाबत मला अतिशय आनंद होत आहे. ही स्वागतार्ह बाब आहे, असे त्या म्हणाल्या. अमर जवान ज्योत हटवल्याप्रकरणी काही राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला होता. याबाबत बोलताना अनिता बोस यांनी सांगितले की, आता ज्या ठिकाणी आता पुतळा स्थापन करण्यात आला आहे, ती जागा कायम रिकामी राहावी, असे विरोधकांचे म्हणणे असेल, तर यावर माझ्याकडे उत्तर नाही. देशातील महान व्यक्तींपैकी एकाची प्रतिमा तिथे लावणे योग्य आहे. ती महात्मा गांधी यांचीही असू शकली असती, असे अनिता बोस यांनी स्पष्ट केले. 

आझाद हिंद फौजेची स्वातंत्र्य मिळण्यात महत्त्वाची भूमिका

काँग्रेसने नेताजींवर अन्याय केला का, यावर बोलताना अनिता बोस म्हणाल्या की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस सरकारला वाटले की, अहिंसेच्या मार्गामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण यामुळे अन्य स्वातंत्र्य सैनिकांना योग्य मान मिळाला नाही. नंतरच्या कागदपत्रांवरून भारताच्या स्वातंत्र्यात आझाद हिंद फौजेचे योगदान आणि भूमिका महत्त्वाची होती, हेच समोर आले, असे अनिता बोस यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच नेताजींना योग्य सन्मान मिळाला का, यावर काही बोलायचे नाही. पण सात दशकांनंतर नेताजींचा सन्मान केला जातोय तसेच त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचतील, याबाबत समाधान वाटते, असेही त्यांनी नमूद केले. 

नेताजी जिवंत असते, तर राष्ट्रपतींचा दर्जा मिळाला असता

नेताजी देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते, याबाबत बोलताना अनिता बोस म्हणाल्या की, नेताजी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळेस काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दर्जा हा राष्ट्रपतीच्या दर्जाप्रमाणे मानला जात असे. भारत सरकारमधील कायद्यानुसार, नेताजींचा दर्जा राष्ट्रपतीपदाएवढा असता. मात्र, आता राष्ट्रपती निवडीची प्रक्रिया वेगळी आहे. नेताजींच्या हिंदुत्वाबाबत बोलताना अनिता बोस म्हणाल्या की, नेताजींचे हिंदुत्वाबाबतचे विचार काय होते, हे मला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. माझ्या मते, धर्म अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र, धर्माच्या नावाखाली चालत असलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत. कोणत्याही एका धर्माला पुढे नेणे, त्याचाच सर्वाधिक पुरस्कार करणे यामुळे दुसऱ्या धर्माला आपण कमी लेखतो, असाही होऊ शकतो आणि हे योग्य नाही. देशातील वातावरण चांगले आणि सकारात्मक राहण्यासाठी या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, असे अनिता बोस यांनी नमूद केले.  

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसMahatma Gandhiमहात्मा गांधी