शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

Anita Bose: “माझे वडील जिवंत असते, तर देशाची फाळणी झाली नसती”; नेताजींच्या कन्येनं गांधीजींबाबतही मांडलं मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 11:10 IST

Anita Bose: नेताजी सुभाषचंद्र बोस जिवंत असते, तर देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते का, यावर कन्या अनिता बोस यांनी रोखठोक मत मांडले.

नवी दिल्ली:महात्मा गांधीची माझे वडील नेताजी सुभाषचंद्र बोस यांना राजकारणापासून दूर ठेऊ इच्छित होते. माझ्या वडिलांना देशाची फाळणी मान्य नव्हती. महात्मा गांधीजींशी असलेल्या मतभेदांनतरही नेताजींनी फाळणीचा विरोधच केला असता. माझे वडील जिवंत असते, तर देशाची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली नसती, असे परखड मत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी व्यक्त केले आहे. अनिता बोस सध्या जर्मनीत राहत असून, २३ जानेवारी रोजी इंडिया गेटवर नेताजींचा होलोग्राम पुतळा स्थापन केल्यावर अनिता बोस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

एका वृत्तपत्राशी संवाद साधताना अनिता बोस म्हणाल्या की, भारत सरकारने इंडिया गेटवर नेताजींची प्रतिमा स्थापन केली, याबाबत मला अतिशय आनंद होत आहे. ही स्वागतार्ह बाब आहे, असे त्या म्हणाल्या. अमर जवान ज्योत हटवल्याप्रकरणी काही राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला होता. याबाबत बोलताना अनिता बोस यांनी सांगितले की, आता ज्या ठिकाणी आता पुतळा स्थापन करण्यात आला आहे, ती जागा कायम रिकामी राहावी, असे विरोधकांचे म्हणणे असेल, तर यावर माझ्याकडे उत्तर नाही. देशातील महान व्यक्तींपैकी एकाची प्रतिमा तिथे लावणे योग्य आहे. ती महात्मा गांधी यांचीही असू शकली असती, असे अनिता बोस यांनी स्पष्ट केले. 

आझाद हिंद फौजेची स्वातंत्र्य मिळण्यात महत्त्वाची भूमिका

काँग्रेसने नेताजींवर अन्याय केला का, यावर बोलताना अनिता बोस म्हणाल्या की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस सरकारला वाटले की, अहिंसेच्या मार्गामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण यामुळे अन्य स्वातंत्र्य सैनिकांना योग्य मान मिळाला नाही. नंतरच्या कागदपत्रांवरून भारताच्या स्वातंत्र्यात आझाद हिंद फौजेचे योगदान आणि भूमिका महत्त्वाची होती, हेच समोर आले, असे अनिता बोस यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच नेताजींना योग्य सन्मान मिळाला का, यावर काही बोलायचे नाही. पण सात दशकांनंतर नेताजींचा सन्मान केला जातोय तसेच त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचतील, याबाबत समाधान वाटते, असेही त्यांनी नमूद केले. 

नेताजी जिवंत असते, तर राष्ट्रपतींचा दर्जा मिळाला असता

नेताजी देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते, याबाबत बोलताना अनिता बोस म्हणाल्या की, नेताजी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळेस काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दर्जा हा राष्ट्रपतीच्या दर्जाप्रमाणे मानला जात असे. भारत सरकारमधील कायद्यानुसार, नेताजींचा दर्जा राष्ट्रपतीपदाएवढा असता. मात्र, आता राष्ट्रपती निवडीची प्रक्रिया वेगळी आहे. नेताजींच्या हिंदुत्वाबाबत बोलताना अनिता बोस म्हणाल्या की, नेताजींचे हिंदुत्वाबाबतचे विचार काय होते, हे मला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. माझ्या मते, धर्म अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र, धर्माच्या नावाखाली चालत असलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत. कोणत्याही एका धर्माला पुढे नेणे, त्याचाच सर्वाधिक पुरस्कार करणे यामुळे दुसऱ्या धर्माला आपण कमी लेखतो, असाही होऊ शकतो आणि हे योग्य नाही. देशातील वातावरण चांगले आणि सकारात्मक राहण्यासाठी या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, असे अनिता बोस यांनी नमूद केले.  

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसMahatma Gandhiमहात्मा गांधी