शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नव्या संसद भवनातील अखंड भारताच्या फोटोमुळे नेपाळमध्ये रोष, पाकिस्तानचीही संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 17:22 IST

New Parliament Building: नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल (प्रचंड) चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यानच नव्या संसद भवनातील अखंड भारताच्या एका फोटोमुळे नेपाळमध्ये वादाला तोंड फुटले आहे.

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल (प्रचंड) चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यानच नव्या संसद भवनातील अखंड भारताच्या एका फोटोमुळे नेपाळमध्ये वादाला तोंड फुटले आहे. नव्या संसद भवनामध्ये लावण्यात आलेला हा हा फोटो वास्तवात एक भित्तीचित्र आहे. त्यालाच अखंड भारताचा नकाशा, असं म्हटलं जात आहे. या नकाशामध्ये गौतम बुद्ध यांचं जन्मस्थान असलेल्या लुंहिनीलाही अखंड भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे नेपाळमधील राजकीय पक्ष संतप्त झाले आहेत.

नेपाळच्या लोकांनी सांगितले की, नव्या संसद भवनामध्ये लागलेल्या भित्तिचित्रामध्ये गौतम बुद्धांच्या जन्मस्थानाला दाखवल्यामुळे भारत या क्षेत्रावर आपला दावा करत आहे, असं वाटतं. नेपाळ आपल्या मानचित्रामध्ये लुंबिनीला मुख्य सांस्कृतिक केंद्रापैकी एक मानतो.

या भित्तिचित्राबाबत नेपाळचे माजी पंतप्रधान बाबूराम भट्टाराई यांनी एका विधानात सांगितले की, या प्रकारामुळे दोन्ही देशांदरम्यान, विश्वासाची कमतरता निर्मांण होऊ शकते. त्यांनी सांगितले की, भारताच्या नव्या संसद भवनामध्ये अखंड भारताचं वादग्रस्त भित्तिचित्र नेपाळसह शेजारील देशांमध्ये अनावश्यक आणि हानिकारक कुटनीतिक वाद भडकवू शकते. भारताच्या बहुतांश शेजाऱ्यांमध्ये आधीपासूनच विश्वासाची कमतरता आहे. त्यामुळे द्विपक्षीय संबंध खराब होत आहेत. नव्या घटनाक्रमामुळे यात अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी द्विपक्षीय चर्चा केली होती. तेव्हापासूनच नेपाळी मीडियामध्ये भित्तिचित्राचा मुद्दा चर्चेत आहे. नव्या संसद भवनामधील अखंड भारताच्या भित्तिचित्रावरून पाकिस्तानचीही आग झाली आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलोच यांनी याबाबत नापसंती व्यक्त केली आहे. भित्तिचित्राला अखंड भारताशी जोडण्याबाबतच्या एक केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्यांच्या विधानांमुळे आम्हाला धक्का बसला आहे, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :ParliamentसंसदIndiaभारतNepalनेपाळ