शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद, रेल्वे रद्द...! तेलंगणा-आंध्रमध्ये पावसाचा कहर, पंतप्रधान मोदी यांचं मुख्यमंत्र्यांना मदतीचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 08:32 IST

AP Telangana Flood : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी संवाद साधून अतिवृष्टी आणि पूर स्थितीचा आढावा घेतला आहे.

Telangana-Andhra Pradesh Flood : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पावसाने कहर केला आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पूर स्थिती निर्माण झाली असून जीवित आणि वित्तहानी, तसेच मोठ्या प्रमाणावर जनजीवनही विस्कळीत झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. यामुळे नद्यांना उधाण आले आहे. हैदराबाद आणि विजयवाडा सारख्या शहरांसह बराच मोठा भाग पाण्याखाली आहे.

पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि बचाव कार्यात समन्वय साधण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी तातडीच्या बैठका घेतल्या. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही दोन्ही मुख्यमंत्र्यांशी संवाध साधला असून त्यांना केंद्राकडून संपूर्ण मदत पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.

याशिवाय, स्थानिक परिस्थितीनुसार 2 सप्टेंबर रोजी शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. रेल्वेचा विचा करता, दक्षिण मध्य रेल्वेच्या (SCR) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने 99 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच चार गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. तर 54 गाड्या वळवण्यात आल्या आहेत.

नरेंद्र मोदींनी घेतला पूर स्थितीचा आढावापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी संवाद साधून अतिवृष्टी आणि पूर स्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच, या दोन्ही राज्यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

तेलंगानामध्ये 9 जणांचा मृत्यू तेलंगणामध्ये पावसाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. रविवारी हैदराबादसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरूच होता. मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी नाले भरून वाहत आहेत. सखल भागात पाणी साचले आहे. पुराच्या पाण्यामुळे गावा गावांतील रस्त्यांद्वारे होणारा संपर्क विस्कळीत झाला आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या.

टॅग्स :floodपूरAndhra Pradeshआंध्र प्रदेशTelanganaतेलंगणाNarendra Modiनरेंद्र मोदीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू