शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आंध्र प्रदेशात चक्रीवादळाने लाखो लोकांचा गेला ‘निवारा’; आठ बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 01:41 IST

एक लाखांवर लोकांना हलविले, १,५९७ गावांना या पुराचा फटका बसला आहे. सहा गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २२३ शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत

विजयवाडा : निवार चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने चित्तोरमध्ये सहा आणि कडप्पात दोन जण बेपत्ता झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, जोरदार पावसामुळे नेल्लोर, प्रकाशम, चित्तोर आणि कडप्पा जिल्ह्यांत १.१२ लाख लोकांना फटका बसला आहे. दोन हजारांवर घरांची पडझड झाली आहे. ८८ मोठी जनावरे, दोन हजारांहून अधिक लहान जनावरे आणि ८ हजारांवर कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. 

१,५९७ गावांना या पुराचा फटका बसला आहे. सहा गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २२३ शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. आतापर्यंत ४० हजारांवर व्यक्तींना पुरातून बाहेर काढण्यात आले असून, त्यांना आश्रय शिबिरात दाखल करण्यात आहे. चार जिल्ह्यांना मदतकार्यासाठी २.५० कोटी  रुपये जारी करण्यात आले आहेत. शिबिरातील प्रत्येकाला ५०० रुपये विशेष साहाय्य देण्यात आले.   

पिकांचे नुकसानप्राथमिक अंदाजानुसार, नेल्लोर, प्रकाशम, चित्तोर आणि कडप्पा, कुर्नूलमध्ये २.१४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाकडून पिकांच्या नुकसानीची माहिती एकत्रित केली जात आहे. राज्य सरकारने मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या आठ टीम आणि एसडीआरएफच्या सहा टीम तैनात केल्या आहेत. रेणीगुंटाजवळ फसलेल्या दोन लोकांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे, तसेच नेल्लोर जिल्ह्यातून फसलेल्या ६० लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.  

टॅग्स :cycloneचक्रीवादळ